शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

जलसंपदा कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 01:29 IST

तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासंदर्भात मुख्य सचिवांनी आदेश देऊनही जलसंपदा विभागातील कर्मचारी गेल्या तीन ते चार वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. सचिवांच्या आदेशानंतरही जलसंपदा विभागाने त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही, असा आरोप करीत कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, यासंदर्भात प्रहार संघटनेच्या वतीने अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देआदेशही दुर्लक्षित : तीन वर्षांपासून लढा सुरू

नाशिक : तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासंदर्भात मुख्य सचिवांनी आदेश देऊनही जलसंपदा विभागातील कर्मचारी गेल्या तीन ते चार वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. सचिवांच्या आदेशानंतरही जलसंपदा विभागाने त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही, असा आरोप करीत कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, यासंदर्भात प्रहार संघटनेच्या वतीने अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी केली आहे.जलसंपदा विभागाच्या नाशिक परिमंडळातील ६० ते ७० चतुर्थश्रेणी कर्मचाºयांना अजूनही पदोन्नतीची प्रतीक्षा आहे. यासाठी गेल्या काही वर्षांपासून संघर्ष करणाºया कर्मचाºयांना न्याय मिळत नसल्याने कर्मचाºयांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली अधीक्षक अभियंता ए. एल. पाठक यांना निवेदन दिले. या पदोन्नत्यांबाबत तत्काळ निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा प्रहारचे जिल्हाप्रमुख अनिल भडांगे यांनी दिला आहे.जलसंपदा विभागाच्या नाशिक परिमंडळात गेल्या १२ वर्षांपासून कार्यरत असलेल्या ६० ते ७० चतुर्थश्रेणी कर्मचाºयांना तृतीय श्रेणीत लिपिक, टंकलेखक म्हणून पदोन्नती मिळू शकलेली नाही. पदोन्नतीसाठी कर्मचाºयांनी जलसंपदा मंत्र्यांपासून ते मुख्य सचिवांपर्यंत पाठपुरावा केलेला आहे. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये तीव्र नाराजी आहे. ‘प्रहार’च्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अधीक्षक अभियंता ए. एल. पाठक यांना निवेदन सादर केले. कर्मचाºयांना न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तू बोडके, शहरप्रमुख श्याम गोसावी, वैभव देशमुख यांच्यासह देवदत्त कटारे, शशिकांत मोरे, राहुल कानडे, नागेश पगारे, निरंजन सोनवणे, गणेश पवार, गजानन पाटील, यशपाल विभांडिक, निशिगंधा आमले, माया जाधव आदी कर्मचारी उपस्थित होते.नाशिकची उदासीनतापदोन्नतीस पात्र असतानाही कर्मचाºयांची पदोन्नती नाकारणारा जलसंपदा विभाग अन्य जिल्ह्णाच्या तुलनेत मागे पडला आहे. औरंगाबाद, नागपूर, ठाणे, पुणे, अमरावती परिमंडळांनी जास्तीत जास्त पदे पदोन्नतीने भरली आहेत. आता केवळ नाशिक परिमंडळ असून सध्या कोणतीही प्रशासकीय अडचण नसल्याने पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकारEmployeeकर्मचारी