शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांचा जीव वाचविण्याला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:14 IST

नाशिक : कोरोना संक्रमणामुळे वाढलेली रुग्णसंख्या नियंत्रणात आणणे प्रथम प्राधान्यावर आहे. नागरिकांचे जीव वाचविणे राज्य शासनाचे प्राधान्य आहे. लोकांचा ...

नाशिक : कोरोना संक्रमणामुळे वाढलेली रुग्णसंख्या नियंत्रणात आणणे प्रथम प्राधान्यावर आहे. नागरिकांचे जीव वाचविणे राज्य शासनाचे प्राधान्य आहे. लोकांचा जीव धोक्यात आलेला असताना केवळ विकासाचा विचार करण्यापेक्षा जीवांचा विचार महत्त्वाचा आहे. त्यामुळे नागरिकांचा जीव वाचला पाहिजे यासाठी लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मालेगाव व नाशिक जिल्ह्याच्या कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते. या वेळी त्यांनी राज्य सरकार नागरिकांच्या जीवाला प्राधान्य देत असल्याचे सांगितले. राज्यात कोरोना संसर्गाचा प्रकोप वाढला असल्याने रुग्णांना बेड, रेमडेसिविर व ऑक्सिजन मिळत नाही. त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही परिस्थिती अशीच सुरू राहिल्यास रुग्ण ठेवायलादेखील जागा मिळणार नाही. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे.

नागरिकांनीदेखील आधीच सावध झाले पाहिजे, बंधने पाळली नाहीत तर प्रयत्न हाताबाहेर जातील. त्यामुळे पंधरा दिवसांचे कडक निर्बंध पाळण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

--इन्फो--

साठेबाजांवर कठोर कारवाई

रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होत आहे. त्यात बऱ्यापैकी सुधारणा होत आहे. दोन-तीन दिवसांत ही परिस्थिती पूर्वपदावर येईल. रेमडेसिविरचा गैरप्रकार करणारे, तसेच जादा दराने विक्री करताना आढळून येणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिला.