किमान आणि कमाल तपमानात सातत्याने घसरण सुरूच असून, सोमवारी (दि.१७) किमान तपमानाचा पारा ८.५अंशांपर्यंत घसरला. या हंगामातील ही नोंद नीचांकी ठरली. एक दिवसात दोन अंशांनी तपमानात घट होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ...
शहरातील खुल्या जागेवरील बेकायदेशीर धार्मिक स्थळांबाबत शासनाकडे पाठविण्यात आलेला महासभेचा प्रस्ताव मंजूर करण्याबाबत आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आमदार आणि महापालिका पदाधिकाऱ्यांना सांगितल्याने हा विषय पुन्हा शासनाच्या कोर्टात टोलावला गेला आहे. ...
गेल्या महिनाभरापासून आपल्या विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर कामबंद आंदोलन करून धरणे आंदोलनास बसलेल्या कोतवालांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी ‘भीक मांगो’ आंदोलन केले. ...
सामनगावरोडवरील हनुमाननगर येथील शासकीय जागेवरील झोपडपट्टी हटवू नये या मागणीसाठी पिपल्स रिपाइंच्या वतीने मनपा विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ...
समाजातील बदलत्या खानपान पद्धतीमुळे शरीरावर होणारे विपरीत परिणाम लक्षात घेता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जन्मतिथी वर्षानिमित्ताने अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या वतीने स्वस्थ भारत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
तब्बल साठ वर्षे सिनेमासृष्टीची सेवा करत भारतीय चित्रपटांच्या संगीताला ज्येष्ठ संगीतकार नौशाद अली यांनी दिशा दिली. त्यांच्या अजरामर संगीतामुळे अनेक चित्रपट गाजले, असे प्रतिपादन नौशाद अली यांचे मराठीत आत्मचरित्र लिहिणारे शशिकांत किणीकर यांनी केले. ...
भारत स्वतंत्र झाल्याचा आनंदोत्सव साजरा होत असतानाच देशाच्या फाळणीच्या वेदना या आनंदावर वीरजण टाकणाऱ्या होत्या. भारत-पाकिस्तान अशा दोन देशांची निर्मिती झाली आणि आजही या फाळणीच्या वेदना जनसामान्यांना अस्वस्थ करून जातात. ...
विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाच्या वतीने चालविण्यात येणाºया आश्रमशाळांच्या मनमानी कारभारला आता चाप बसणार आहे. आश्रमशाळांमध्ये सोयीसुविधांबाबत त्रुटी आढळल्यास दहा हजार रुपये दंड प्रसंगी मान्यता रद्द करण्याची कारवाईदेखील ...
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एस.एम.आर.के. माहिला महाविद्यालयात आयोजित सृजन या शैक्षणिक प्रदर्शनाचे उद्घाटन शरयू देशमुख यांच्या हस्ते झाले. देशमुख पुढे म्हणाल्या की, शिक्षणाचा उपयोग करून स्वत:चे उद्योगविश्व तयार करा. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे सशक्त मा ...