शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
3
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
4
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
5
वयाच्या १५ व्या वर्षीच अक्षय कुमारच्या लेकाने सोडलंय घर, आरवच्या सवयी वाचून व्हाल शॉक!
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
7
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
8
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
9
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
10
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
11
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
12
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
13
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
14
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
15
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
16
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली
17
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
18
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
19
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
20
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ

नगरपंचायतीतले खांदेपालट !

By किरण अग्रवाल | Published: June 03, 2018 2:08 AM

ग्रामपंचायत ते नगरपंचायत, असा टप्पा गाठत विकासाच्या मार्गावर धावू पाहणाऱ्या जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींमध्ये नेतृत्वाचा खांदेपालट झाला असून, नवीन पदाधिकाºयांकडेही पूर्वीइतक्याच अपेक्षेने बघितले जाणे स्वाभाविक आहे.

ठळक मुद्देअडीच वर्षांपूर्वी प्रथमच निवडणुका पार पडल्या उर्वरित काळासाठी खांदेपालट झाला खांदेपालट नवीन करून दाखविणारा ठरो

ग्रामपंचायत ते नगरपंचायत, असा टप्पा गाठत विकासाच्या मार्गावर धावू पाहणाऱ्या जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींमध्ये नेतृत्वाचा खांदेपालट झाला असून, नवीन पदाधिकाºयांकडेही पूर्वीइतक्याच अपेक्षेने बघितले जाणे स्वाभाविक आहे. ग्रामपालिकांना नगरपंचायतींचा दर्जा मिळाल्यानंतरच्या पहिल्याच पंचवार्षिकमधील हा नेतृत्वबदल असल्यानेही यासंदर्भातील अपेक्षा जरा अधिकच्याच म्हणता याव्यात.जिल्ह्यातील कळवण, देवळा, चांदवड, पेठ, सुरगाणा आणि निफाड या सहाही ग्रामपंचायतींना नगरपंचायतींचा दर्जा देण्यात आल्यानंतर अडीच वर्षांपूर्वी प्रथमच नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडल्या होत्या. ग्रामविकासाकडून नगरविकासाची संधी म्हणून त्यावेळी पहिल्या पदाधिकाºयांकडून अपेक्षा केली गेली होती. त्यातील काहींनी त्या दिशेने चांगली पावले उचलल्याचेही दिसून आले. परंतु अडीच वर्षांच्या या पहिल्या आवर्तनात व्यवस्था बदलातील नवीनता जाणून घेण्यातही अनेकांचा वेळ गेला. आता उर्वरित काळासाठी खांदेपालट झाला असून, या पदाधिकाºयांकडून केल्या जाणाºया कामांच्या बळावर पुढच्या वेळी त्यांच्या पक्षांना थेट निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. म्हणूनही या पदाधिकाºयांकडून जरा जास्तीच्याच अपेक्षा केल्या जात आहे. विशेष म्हणजे, महापालिका व मोठ्या स्तरावर पक्षीय अभिनिवेशातून काही गोष्टी घडून येताना दिसत असल्या तरी नगरपंचायत, परिषद स्तरावर तितकीशी पक्षीय आढ्यता नसते. कळवणचेच उदाहरण घ्या, काँग्रेस व भाजपा-शिवसेना हे तसे पारंपरिक विरोधक; सद्यस्थितीत तर शिवसेना व भाजपातही टोकाचे वितुष्ट आलेले आहे व स्वबळाची आजमावणी सुरू आहे; परंतु असे असताना कळवण नगरपंचायतीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा व शिवसेना अशा साºयांनी मिळून विकास आघाडी केली आहे. तेथे साºयांचे व्यवस्थित सुरू आहे. विकासात राजकारण नकोच; पण कळवण शेजारच्या सुरगाण्यात मात्र शिवसेना-भाजपाचे बहुमत असूनही यंदा भाजपाने आपली ‘टर्म’ पूर्ण करून घेतल्यावर शिवसेनेचे बोट सोडून दिले, त्यामुळे सेनेला उपनगराध्यक्ष पदावर समाधान मानावे लागले. या दोन्ही पक्षांत त्यामुळे नाराजीचा सुरुंग लागून गेला आहे. दुसरे असे की, खांदेपालट झाला असला तरी काही ठिकाणच्या सत्तेचे सूत्रधार तीच मंडळी राहणार आहे. देवळ्यात दुसºया आवर्तनातही पहिल्याच नगराध्यक्षांकडे सूत्रे आली आहे. चांदवडमध्ये कालचे नगराध्यक्षच आज उपनगराध्यक्षपदी विराजमान झाले आहेत, तर कळवण येथे काल नगराध्यक्ष असलेल्यांचे पतीच आज उपनगराध्यक्ष बनले आहेत. तेव्हा म्हणायला, पंचवार्षिक सत्तेच्या दुसºया आवर्तनात नेतृत्व बदल झालेला असला तरी सूत्रे तशी जुन्यांकडेच दिसत आहेत. सुरगाण्यात प्रथमच दोन्ही पदांवर महिलाराज अवतरले आहे. या सर्वच नव्या पदाधिकाºयांची जबाबदारी यासाठीही वाढून गेली आहे की, पहिल्या अडीच वर्षाच्या काळात त्यांना संस्थागत बदललेल्या व्यवस्थेची माहिती होऊन गेली आहे. त्यामुळे आता विकासाच्या प्रक्रियेला वेग देऊन नागरिकांच्या अपेक्षापूर्तीच्या दिशेने ठोस कार्यक्रम राबवावा लागेल. त्यादृष्टीने सर्वच नगरपंचायतींमधील खांदेपालट नवीन काही घडविणारा व वेगळे काही करून दाखविणारा ठरो हीच अपेक्षा.

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूक