शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

शहर व ग्रामीण भागात उन्हाचा तडाखा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:15 IST

शहर व ग्रामीण भागात उन्हाचा तडाखा वाढला दुपारी वर्दळ कमी ; अडगळीतले कुलर निघाले बाहेर सिन्नर :शहर व ...

शहर व ग्रामीण भागात उन्हाचा तडाखा वाढला

दुपारी वर्दळ कमी ; अडगळीतले कुलर निघाले बाहेर

सिन्नर :शहर व तालुक्यात गेल्या चार- पाच दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला असून पारा ३५ अंशापार गेला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे रस्त्यावरील दुपारची वर्दळ कमी झाली असून सहा ते सात महिन्यांपासून अडगळीला पडलेली कुलर आता बाहेर निघत आहे.

तालुक्यात होळी संपल्यानंतर सुर्याचा पारा चढत जातो, असा सर्वमान्याचे संकेत आहे. मात्र सिन्नर शहरासह तालुक्यात मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच सुर्याचा पारा चढू लागला असून उन्हाचा पारा ३५ अंशापार गेला आहे. उन्हाची काहिली सिन्नरकरांना आत्तापासूनच असह्य होऊ लागली आहे. पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्याला लवकरच सुरूवात झाल्याचे दिसून येत आहे. मागील आठ दिवसांपासून सुर्य आग ओकू लागल्याचे भासत आहे. दिवसेंदिवस उन्हाची काहिली वाढत असल्याने नागरिकांनाही ती असह्य होऊ लागली आहे. शनिवारी तालुक्यात ३६अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी देखील ३६.१ अंश सेल्सिअस तापमान होते. यंदा मार्च महिन्यातच सुर्याचा पारा ३६ अंशापार गेल्याने एप्रिल आणि मे महिन्यात काय हाल होतील, याची चिंता सिन्नरकरांना लागली आहे. उन्हाचा पारा सातत्याने वाढत असल्याने नागरिकांनीही दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणे कमी केले आहे. आवश्यक कामासाठीच नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे दुपारच्या सुमारास शहरातील मुख्य रस्त्यावरील वर्दळ कमी होऊ लागली आहे. मुख्य बाजारपेठ वगळता तर इतर मार्ग दुपारच्या सुमारास ओस पडल्याचे दिसून येत आहे. दुपारची वर्दळ कमी झाल्याने सायंकाळी व रात्रीच्या सुमारास मुख्य रस्त्यावरील वर्दळ वाढली आहे. नागरिक आपल्या कुटुंबासह खरेदीसाठी सायंकाळीच घराबाहेर पडताना दिसून येत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक विविध उपाय करताना दिसून येत आहे. तोंडावर रुमाल, डोक्यावर टोपी घालणे सुरू केले आहे. त्यामुळे टोप्यांची दुकाने, गॉगल्सची दुकाने फुटपाथवर लागली आहे. याशिवाय शहरातील गल्लीबोळात फिरत्या रसवंत्या दिसू लागल्या आहेत.

चौकट : पाण्याची पातळी खालावली

उन्हाची काहिली वाढल्याने पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात आहे. नदी-नाले, तलाव आटण्याच्या मार्गावर आहे. ग्रामीण भागातील जलस्रोत असलेल्या विहिरी, बोअरवेल यांचे पाणीही कमी होत आहे. त्यामुळे यंदा पाऊस चांगला होऊनही लवकरच टंचाईचा सामना करावा लागतो की काय असा प्रश्न पडला आहे. काही ठिकाणी जोमात असलेली पिके उन्हामुळे सुकू लागली असून त्याचा उत्पन्नावर परिणाम होणार आहे.