हरणबारी, केळझरमधून रब्बीसाठी दोन आवर्तने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 10:34 PM2020-01-24T22:34:35+5:302020-01-25T00:20:17+5:30

सटाणा : बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातून यंदा रब्बीसाठी दोन आवर्तने सोडण्याबाबत तसेच पिण्यासाठी अनुक्र मे ३९० व ...

Haranbari, two versions for the Rabbi from Kelzer | हरणबारी, केळझरमधून रब्बीसाठी दोन आवर्तने

हरणबारी, केळझरमधून रब्बीसाठी दोन आवर्तने

Next
ठळक मुद्देबागलाण : समितीच्या बैठकीत पाणी आरक्षित करण्याचा निर्णय

सटाणा : बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातून यंदा रब्बीसाठी दोन आवर्तने सोडण्याबाबत तसेच पिण्यासाठी अनुक्र मे ३९० व १०१ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयात बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.२४) कालवा समितीची बैठक पार पडली. बैठकीस मालेगाव येथील जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश चौधरी, उपअभियंता ई.बी. शेवाळे, उपअभियंता अभिजित रौंदळ, शाखा अभियंता आर.बी. सूर्यवंशी, संजय पाटील उपस्थित होते. समितीच्या बैठकीत यंदाच्या रब्बी हंगामाचा प्राथमिक सिंचन आराखडा तयार करण्यात आला. तालुक्यातील हरणबारी मध्यम प्रकल्पातून सुमारे दोन हजार १५ हेक्टर या रब्बी क्षेत्राला पाणी दिले जाते, तर केळझर मध्यम प्रकल्पातून १ हजार १८० हेक्टर रब्बी क्षेत्राला पाणी दिले जाते. यंदा रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी तीन आवर्तनांची मागणी केली होती. मात्र पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणात वाढ झाल्याने रब्बीसाठी दोनच आवर्तनाचे नियोजन करण्यात आल्याचे यावेळी कार्यकारी अभियंता चौधरी यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार हरणबारी धरणातून रब्बीसाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले असून, २५० दशलक्ष घनफूट पाणी देण्यात येणार आहे. उर्वरित पाण्याचे दुसरे आवर्तन २५ फेब्रुवारीला सोडण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला, तर केळझर धरणातून येत्या १० फेब्रुवारीला े आवर्तन सोडण्यात येणार आहे. यासाठी १५४ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे.
दरम्यान, आमदार दिलीप बोरसे यांनी रब्बीचे पाणी शेतकºयांच्या शेतापर्यंत कसे पोहोचेल यासाठी आवश्यक ठिकाणी कालव्यांची दुरु स्ती करावी. तसेच रब्बी पिकांसाठी ठरल्याप्रमाणे दिले जाणारे दोन्ही आवर्तने शेवटच्या शेतकºयापर्यंत कसे पोहोचेल यासाठी नियोजन करावे. जेणेकरून पीक हातात येईल, अशा सूचना यावेळी संबधित अधिकाºयांना देण्यात आल्या. बैठकीस केदाबापू काकुळते, बाळासाहेब भदाणे, पांडुरंग सोनवणे, माधवराव सोनवणे, जनार्दन सोनवणे, भास्कर सोनवणे आदी शेतकरी उपस्थित होते.

..असा आहे रब्बीचा सिंचन आराखडा...
हरणबारी धरण पाणीसाठा ११६६ दशलक्ष घनफूट पैकी बाष्पीभवन तूट ११७ दशलक्ष घनफूट, पिण्याच्या पाण्याचे आरक्षण ३९० दशलक्ष घनफूट, रब्बी हंगामासाठी ६५९ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले आहे. केळझर धरणात ५७२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. पैकी बाष्पीभवन तूट ८६ दशलक्ष घनफूट, पिण्यासाठी १०१ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित केले आहे. ३८५ दशलक्ष घनफूट पाणी रब्बीसाठी आरक्षित करण्यात आले आहे.

Web Title: Haranbari, two versions for the Rabbi from Kelzer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.