शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
5
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
6
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
7
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
8
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
9
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
10
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
11
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
12
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
13
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
14
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
15
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
16
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
17
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
18
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
19
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
20
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षतोडीच्या निर्णयाला पुन्हा न्यायालयात आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:19 IST

नाशिक शहरातील वृक्षप्रेमी ऋषिकेश नाझरे यांनी २०१५ मध्ये केलेल्या याचिकेत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा जाणीवपूर्वक अवमान करून आदेशाचे उल्लंघन ...

नाशिक शहरातील वृक्षप्रेमी ऋषिकेश नाझरे यांनी २०१५ मध्ये केलेल्या याचिकेत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा जाणीवपूर्वक अवमान करून आदेशाचे उल्लंघन केले जात असल्याचा आराेप करण्यात आला आहे. त्यासंदर्भातील नोटिसा नाझरे यांनी महापालिका आयुक्त, महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती तसेच वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक यांना बजावल्या आहेत.

नाशिक शहरातून जाणाऱ्या मुंबई- आग्रा महामार्गाचे रूंदीकरण करण्यासाठी वृक्षतोड करण्यात येणार होती. त्यावेळी २००६ मध्ये नाशिक कृती समिती या पर्यावरण प्रेमींच्या संस्थेने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर महापालिकेने २०१५ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरातील २४०० झाडे ताेडण्यासाठी उच्च न्यायालयातच याचिका दाखल केली होती. त्या अनुषंगाने ऋषिकेश नाझरे यांनी २०१४ मध्ये सिव्हिल ॲप्लिकेशन दाखल केले होते. त्यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने रस्त्यांच्या कडेला आणि मध्यभागी असलेल्या झाडांची पाहणी करण्यासाठी एक समितीही नियुक्त केली हाेती. त्या आधारे उच्च न्यायालयाने ८ मे २०१५ मध्ये निकाल दिला. यावेळी रस्त्याच्या मध्यभागी असलेली वड, पिंपळ,उंबर यासारखी पाच प्रकारची झाडे ताेडण्यास मनाई केली होती. इतकेच नव्हे तर त्याच्या पुनर्ररोपणासाठी देखील मनाई केली होती. मात्र आता अलीकडेच महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने गंगापूर रोड आणि दिंडाेरी रोडवरील रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या २९ झाडांचे पुनर्ररोपण करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने २०१५ मध्ये दिलेल्या आदेशाचे जाणीवपूर्वक अवमान करण्याच्या उद्देशानेच ही कृती केली जात असल्याचे नाझरे यांनी महापालिकेला दिलेल्या नोटिसीत नमूद केले आहे.

आता वृक्ष तोडीचा विषय न्यायालयात गेल्याने तूर्तास महापालिकेकडूनच २९ झाडे तोडण्यास ब्रेक मिळण्याची शक्यता आहे, लवकरच त्यावर सुनावणी होणार आहे.

इन्फो...

महापालिकेने वाहतुकीस अडथळा हाेत असल्याचे निमित्त करून हे वृक्ष हटविण्याची तयारी केली असली तरी मुळातच या वृक्षांमुळे वाहतुकीस अडथळा होत नसल्याचे नाझरे यांनी नमूद केले आहे. महापालिकेने निर्णय घेताना आपल्याला कळवले नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.