शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी कारखान्याचे चेअरमन आणि संचालक यांच्यात जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्याची 22 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना साईटवर चेअरमन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्याची 22 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना साईटवर चेअरमन शिरीष नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. विविध विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. दरम्यान, सभेनंतर साखर कारखान्याचे चेअरमन व    माजी व्हा.चेअरमन यांच्यात परस्परविरोधी झालेल्या पत्रकार परिषदांमध्ये एकमेकांवर आरोप करण्यात आले.मागील गाळप हंगामात गाळप झालेला ऊस, या वर्षात कार्यक्षेत्रात उपलब्ध असलेला ऊस, गेल्या आर्थिक वर्षाचा ताळेबंद व यंदाच्या अंदाजित खर्चास सभेत मान्यता देण्यात आली. कारखान्याचे संस्थापक व्हाईस चेअरमन माणिकराव गावीत यांनी सभेत मार्गदर्शन केले. विषयसूचीनुसार विषयांचे  वाचन दिलीप पवार यांनी केले. सभेत सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.गेल्या  आर्थिक वर्षाच्या प्रगतीच्या अहवालाचे वाचन चेअरमन शिरीष नाईक यांनी केले. साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन आमदार सुरुपसिंग नाईक, व्हाईस चेअरमन सखाराम महाराज, सर्व संचालक, कार्यकारी संचालक विजयानंद कुशारे, सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी व  ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.कारखान्यात मनमानी कारभार-भरत गावीत यांचा आरोपआदिवासी व सर्वसामान्य शेतक:यांच्या  सर्वागिण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या आदिवासी सहकारी साखर कारखान्यात चेअरमन व कार्यकारी संचालक यांचा मनमानी कारभार सुरु असून एकूणच सावळा गोंधळ सुरु आहे, असा आरोप माजी व्हाईस चेअरमन व विद्यमान संचालक भरत गावीत यांनी पत्रकार परिषदेत केला. कारखान्याच्या वार्षिक सभेचे अजेंडे सभेच्या किमान 15 दिवस आधी सभासदांना दिले गेले पाहिजे होते. प्रत्यक्षात तसे झाले नाही.  कारखाना कर्मचा:यांना चार महिन्यापासून पगार नाही. त्यांना पगार किती हे सांगत नाही. पदाप्रमाणे पगार दिला जात नाही. नोकरी सोडून गेलेल्यांचा पगार दिला नाही. उस उत्पादनाचा टनेज वाढला नाही. मागण्यांसंदर्भात उत्तर न मिळाल्याने माहितीचा अधिकार टाकला. त्याचेही उत्तर नाही. संचालकांना कारखाना माहीती देत नाही तर सर्वसामान्य शेतक:यांची अवस्था काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.कारखान्यात राजकारण नको-चेअरमन शिरीष नाईकनिवडणूका जवळ येऊन ठेपल्यानेच राजकीय लाभ करुन घेण्याच्या इराद्याने हे आरोप करण्यात आले आहेत. कारखाना हा सर्वसामान्य शेतक:यांचा आहे. त्यामुळे त्यात राजकारण आणू नका, असे स्पष्टीकरण चेअरमन शिरीष नाईक यांनी पत्रकार परिषदेत केले. ते म्हणाले की, दोन पंचवार्षिकेत भरत गावीत व्हाईस चेअरमन व संचालक आहेत. त्यांनी मासिक बैठका वा इतर कोणत्याही बैठकांमधून ‘ब्र’ काढला नाही?  कारखान्यात कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी त्रिस्तरीय वेतन समितीकडून वेतन निश्चिती केली जाते. त्यानुसार वेतन दिले जाते. आजच्या घटकेस कुठल्याही कर्मचा:याची कुठलीही देणी बाकी नाही. शेतक:यांचे हित जोपासण्यासाठी चालूवर्षी एकरकमी प्रती मेट्रीक टन उसासाठी दोन हजार 308 रुपये दिले असून  शेतकरी या रक्कमेत खूष आहेत. त्यांची पिळवणूक केली असती तर शेतक:यांनी मोर्च आणले असते. कारखाना चांगल्या स्थितीत चालू असून राजकारणाच्या वादात त्याचा बळी देऊ नका, असेही त्यांनी सांगितले.