शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनचा फायदा उचलत व्यापाऱ्यांकडून पिळवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसला. परंतु प्रशासनाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसला. परंतु प्रशासनाच्या सहकार्याने त्यावर तोडगाही निघाला. शेतीमाल वाहतुकीसाठी रितसर परवाना घेऊन वाहतुकीस परवानगी प्रशासनाने दिलेली आहे. परंतु या लॉकडाऊनचा फायदा घेत पपई खरेदीदार व्यापारी मात्र शेतकºयांना वेठीस धरत असल्याचे चित्र आहे. चार रुपये प्रती किलोप्रमाणे पपईची खरेदी सुरू असून अचानक भाव कोसळल्याने शेतकरी मात्र मेटाकुटीला आला आहे.जिल्ह्यात बहुतांश शेतकºयांनी पपईची लागवड केली आहे. यंदा उशिराने लागवड झाल्याने फळधारणाही उशीराच झाली. त्यामुळे ऐन बहरात असताना व्यापाºयांनी अनेकवेळा हंगामात शेतकºयांना दरासंबंधी वेठीस धरले होते. आता तर कोरोनाचे कारण पुढे करत शेतकºयांना पुरते मेटाकुटीस आणले आहे. पपई हे नाशवंत पीक असल्यामुळे शेतकºयांना त्याचा साठाही करता येत नाही. शिवाय बाजारपेठ जवळपास नसल्याने स्वत:ही विकणे अवघड होते. त्यामुळे सर्वस्वी व्यापाºयांवर अवलंबून राहावे लागत आहे. पपई खरेदीदार व्यापारी मात्र संधीचे सोने करण्याची तसूभरही संधी सोडत नाहीत हे आजपर्यंत घडलेल्या घटनांवरून जाणवते. वास्तविक पाहता बाहेरील राज्यांमध्ये पपईची ठोक विक्री १६ ते १७ रुपयांप्रमाणे सुरू आहे. व्यापाºयांना माल खरेदी करून संबंधित बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी सहा रुपये प्रती किलोप्रमाणे खर्च येत असल्याचे सांगितले जाते. तरीही शेतकºयांकडून चार रुपये किलोप्रमाणे खरेदी सुरू आहे. यात मात्र शेतकरी होरपळत आहे.४लॉकडाऊन असलेल्या परिस्थितीत प्रशासनाने शेतीमाल वाहतुकीसाठी मुभा दिली असली तरी व्यापारी शेतकºयांच्या मालाला तोडणीसाठी धजावत नव्हते. शहादा पालिकेचे नगरसेवक संदीप पाटील यांनी पुढाकार घेत प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी व व्यापारी यांच्यात एक बैठक घेऊन माल तोडणीसंबंधी तोडगा काढला व शेतकºयांच्या मालाला तोडण्याचे आवाहन केले. मात्र दरासंबंधीचा तोडगा अद्यापही कायम आहे. तो तोडगा निघावा व शेतकºयांची होणारी होरफळ थांबवावी, अशी मागणी होत आहे.शेतकºयांची पपई झाडावरच पिकत होती. लॉकडाऊनचे कारण पुढे करत व्यापारी तोडणीस धजावत नव्हते. प्रशासन व व्यापारी यांच्यात बैठक घेऊन पपई तोडणीसंबंधी तोडगा निघाला. परंतु दराबाबतची समस्या अजूनही कायम आहे.-संदीप पाटील, नगरसेवक व पपई उत्पादक शेतकरी, शहादा.