शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
2
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
3
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
4
नॉक आऊट सामन्यात DC चा पलटवार; अभिषेक, होप, रिषभ, स्तब्स यांची फटकेबाजी
5
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
6
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
7
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
8
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
9
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
10
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
11
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
12
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
13
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
14
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
15
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
16
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
17
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

बाहेरगावाहून आले २२ हजार नागरिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 12:30 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाला थोपवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने दक्षता म्हणून घोषित केलेल्या लॉकडाऊन काळातही जिल्ह्यात तब्बल ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाला थोपवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने दक्षता म्हणून घोषित केलेल्या लॉकडाऊन काळातही जिल्ह्यात तब्बल २३ हजार नागरिक परतले आहेत़ येथील मूळ रहिवासी असलेल्या या नागरिकांचे मोठ्या शहरांमध्ये हाल होण्याची शक्यता असल्याने त्यांनी गावाची वाट धरली होती़ या सर्वांच्या तपासण्या पूर्ण करण्यात आल्या असून एकासही कोरोनासारखी लक्षणे असलेले किरकोळ आजार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे़देशात कोरोनाचे संकट घोंघावू लागल्यानंतर जिल्ह्यातून नोकरी आणि व्यवसायानिमित्त पुणे, मुंबई, नाशिक यासह राज्यातील इतर मोठी शहरे आणि देशातील इतर शहरांमध्ये निवास करणाऱ्यांनी जिल्ह्याची वाट धरली होती़ मिळेल त्या वाहनाने या ‘भूमीपुत्रां’चे लोंढे जिल्ह्यात येत होते़ या लोंढ्यांमधून कोरोनाचा फैलाव होण्याची भिती असल्याने पोलीस दलाने जिल्हा आणि राज्य सीमेवर त्यांची तपासणी केी होती़ या सर्वांची सिमेवर तपासणी करण्यात आल्यानंतर घरीही त्यांची योग्य पद्धतीने तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात आरोग्य विभाग, महसूल आणि जिल्हा परिषदेच्या पथकांनीही भेटी दिल्या होत्या़ यातून या सर्वांची प्रकृती चांगली असल्याची माहिती असून एकातही कोरोनाची लक्षणे किंवा तत्सम आजारही नसल्याची माहिती देण्यात आली आहे़ जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यात आलेल्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आशा, अंगणवाडी सेविका आणि तलाठी यांच्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे़ तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनात कार्यरत असलेल्या या पथकांकडून दर दिवशी घेतल्या जाणाºया आढाव्यामुळे रोज सद्यस्थिती समोर येत आहे़ दरम्यान जिल्ह्यात बाहेरगावाहून येणाऱ्यांचे लोंढे थांबलेले नसून दरदिवशी नागरिक मिळेल त्या मार्गाने येत असल्याची माहिती देण्यात आली आहे़ पोलीस प्रशासनाकडून ९ ठिकाणी जिल्ह्याच्या सीमा सील केल्यानंतर येणाºया नागरिकांच्या लोंढ्यामुळे चिंता असली तरी त्यांच्या आरोग्य तपासणीला प्रथम प्राधान्य दिले जात आहे़

आरोग्य विभागाने बाहेरगावाहून आलेल्या २२ हजार ८०० नागरिकांच्या आतापर्यंत तपासण्या पूर्ण केल्या आहेत़यात नवापुर येथील एकास सर्दी, खोकला आणि ताप असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते़ नवापुरचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी त्याच्या कुटूंबाची भेट घेत माहिती जाणून घेतली असता, संबधित व्यक्ती हा पुणे येथून आल्याचे सांगण्यात आले होते़ त्याचे स्वॅब नमुने पुणे येथे एनआयव्हीकडे पाठवण्यात आले होते़ दक्षता म्हणून त्याच्या संपर्कात आलेल्या पाच जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे़प्रशासनाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार गेल्या १० दिवसात नंदुरबार तालुक्यात ८ हजार ३७२, शहादा ६ हजार ३६१, तळोदा ८३५, अक्कलकुवा ३ हजार ७००, नवापुर तालुक्यात १ हजार ८८२ तर धडगाव तालुक्यात १ हजार ५६० बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांच्या तपासण्या करुन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे़ या २२ हजार ८०० पैकी एकासही कोरोनासदृश लक्षणे नसून त्यांच्या प्रकृतीवर ग्रामसमित्या लक्ष ठेवून आहेत़दक्षता म्हणून आरोग्य विभागाकडून तालुकानिहाय किमान ५० पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे़ हे पथक दरदिवशी क्वारंटाईन नागरिकांची चौकशी करुन अहवाल आरोग्य विभागाकडे देत आहेत़शहादा तालुक्यात ३ हजार ३४६ नागरिकांचे दक्षता म्हणून क्वारंटाईन करण्यात आले होते़ यात २० जण हे परदेशातून आले असल्याची माहिती देण्यात आली होती़ सर्व २० जणांच्या तपासण्या पूर्ण करण्यात आल्यानंतर या सर्वांची प्रकृती सुरळीत असल्याची माहिती देण्यात आली आहे़दरम्यान शुक्रवारपासून जिल्ह्यात आरोग्य विभागाच्यावतीने आशा आणि अंगणवाडी सेविका यांचे पथक घरोघरी पुन्हा सर्वेक्षण करणार असून त्यांच्याकडून किरकोळ आजारींची माहिती संकलित होणार आहे़