शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
6
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
7
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
8
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
9
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
10
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
11
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
12
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
13
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
14
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
15
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
16
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
17
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
18
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
19
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
20
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं

१३९ आश्रम शाळांमध्ये उद्यापासून अध्यापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 12:39 PM

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :   जिल्ह्यातील १३९ आश्रमशाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याची तयारी पुर्ण करण्यात आली आहे. नववी ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :   जिल्ह्यातील १३९ आश्रमशाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याची तयारी पुर्ण करण्यात आली आहे. नववी ते बारावीचे साधारणत: साडेआठ हजार विद्यार्थी असून त्यापैकी ७० टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमतीपत्र भरून दिले आहे. आश्रम शाळेत केवळ इंग्रजी, गणित व विज्ञानच्याच तासिका होणार आहेत. दरम्यान, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना  चाचणी जवळपास पुर्णत्वास आली आहे. त्यातील एक टक्केपेक्षा कमी कर्मचारी पॅाझिटिव्ह आढळून आले आहेत.  शासनाने १ डिसेंबरपासून आश्रमशाळा सुरू करण्याचे निर्देश दिल्याने त्या दृष्टीने नंदुरबार व तळोदा प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत तयारी करण्यात येत आहे. शाळा खोल्यांचे निर्जंतुकीकरण, परिसर स्वच्छता यासह इतर बाबींसाठी कर्मचारी २१ नोव्हेंबरपासून शाळेवर हजर राहत आहेत. आश्रम शाळेत विद्यार्थी आणण्याची मोठी कसरत आता शिक्षकांना पार पाडावी लागत आहे. आवश्यक तयारी पुर्णनंदुरबार जिल्ह्यात दोन प्रकल्प कार्यालय आहे. या दोन्ही कार्यालय मिळून एकुण १३९ आश्रमशाळा आहेत. त्यात ७४ शासकीय तर ६५ अनुदानीत आश्रम शाळांचा समावेश आहे. याशिवाय ४७ वसतिगृहे आहेत. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा विचार करता एकुण साडेआठ हजार विद्यार्थी आहेत.  दुर्गम भागातील आश्रम शाळांमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्यासह इतर कामांना वेग देण्यात आला होता. जवळपास सर्वच आश्रम शाळांमध्ये आवश्यक ती तयारी पुर्ण करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांंचे संमती पत्रदोन्ही प्रकल्प मिळून जवळपास साडेआठ हजार आहेत. या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमती पत्र भरून घेण्यात येत आहे. आतापर्यंत जवळपास ७० टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांनी असे पत्र भरून दिले आहे. विद्यार्थ्यांची सर्वस्वी जबाबदारी आता शिक्षक आणि संस्थाचालकांना घ्यावी लागणार असल्यामुळे शिक्षक व कर्मचारी वर्ग अलर्ट झाला आहे. कोरोना चाचणीशिक्षकांची कोरोना चाचणी करण्याच्या सुचना यापूर्वीच देण्यात आल्या होत्या. त्यानुसार शिक्षकांनी कोरोना चाचण्या करून घेतल्या. दोन्ही प्रकल्प मिळून एक टक्केपेक्षा कमी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोरोना पॅाझिटिव्ह आले आहेत. नंदुरबार प्रकल्पाअंतर्गत केवळ ११ कर्मचारी पॅाझिटिव्ह आले आहेत. शिक्षकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.    

आहार शाळेतच शिजविणार आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना आहार शाळेतच शिजवून देणार आहेत. त्यासाठी सात दिवस पुरेल एवढे अन्नधान्य व इतर साहित्य खरेदी करण्याच्या सुचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. सेंट्रल किचनमधून २१ शाळांना शिधा वाटप केले जात आहे. शाळांनी ते शिजवून विद्यार्थ्यांना आवश्यक तसे वाटप करणे आवश्यक आहे. 

  केवळ तीन विषयांचे अध्यापन आश्रम शाळांचे नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात येत असले तरी त्यात केवळ तीन विषयांचेच अध्यापन करण्यात येणार आहे. त्यात इंग्रजी, विज्ञान व गणिताचा समावेश आहे. इतर विषयांचे अध्यापन पुर्वीप्रमाणेच राहणार आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक ते शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठीचे नियोजन आधीपासूनच झाले आहे. 

संस्थाचालकांनी खरेदी करावे... : वर्ग खोल्या सॅनिटाईझ करण्यासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्याची जबाबदारी खाजगी आश्रम शाळांच्या संस्थाचालकांची राहणार आहे.