शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
2
जयंत पाटील यांचा CM देवेंद्र फडणवीसांना सल्ला; म्हणाले, “ताफ्यात फक्त एक कार अन्…”
3
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
4
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
5
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
6
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
7
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
8
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
9
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
10
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
11
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
12
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
13
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
14
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
15
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
16
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
17
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
18
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
19
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
20
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कडधान्याची उत्पादकता ३० टक्क्यांनी घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 11:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत पावसाची नोंद झाली आहे. परंतु आॅगस्टच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात संततधार ...


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत पावसाची नोंद झाली आहे. परंतु आॅगस्टच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात संततधार पावसामुळे कडधान्य पिकाला मोठा फटका बसला आहे. उडीद, मूग, चवळी यासह सोयाबीन व काही प्रमाणात कापसाचा समावेश आहे. अती पावसामुळे ही पिके सडली, काही ठिकाणी पिवळी पडली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी यंदा पर्जन्यमान चांगले, पीक स्थिती चांगली असतांनाही या पिकांची उत्पादकता २५ ते ३० टक्के कमी होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात यंदा वेळेवर पाऊस झाला. मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने अनेक शेतकºयांनी कापूस लागवड केली होती. बागायतदार शेतकºयांनी देखील कडधान्य व तृणधान्याची पेरणी केली होती. परंतु मध्यंतरी पावसाने ताण दिल्याने आणि सरासरी इतका देखील पाऊस न झाल्याने पिकांची अवस्था वाईट झाली होती. शेतकºयांनी जेमतेम अर्थात पुर्ण जुलै महिना पीक वाचविण्याची धडपड केली. आॅगस्ट महिन्यात मात्र समाधानकारक पाऊस झाला. तिसºया व चौथ्या आठवड्यातील पावसाने मात्र पिकांवर परिणाम केल्याचे चित्र आहे.
तूट काढली भरून
आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाची तूट ही ३५ टक्केपर्यंत वाढली होती. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती. लघु व मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा देखील सरासरीचा ४० टक्के देखील झालेला नव्हता. विहिरी व कुपनलिकांच्या पाणी पातळीवर परिणाम झाला होता.
नदी, नाले कोरडेच होते. परंतु आॅगस्टच्या दुसºया आठवड्यापासून पावसाने बºयापैकी हजेरी लावली. तिसºया व चौथ्या आठवड्यात संततधार आणि मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाने दैना उडवून दिली. तूट देखील आॅगस्टच्या अखेर अवघी चार टक्क्यावर आली. जुलैच्या सुरुवातीपर्यंत तूट भरून निघाली आहे. आता सरासरीचा ९२ टक्केपर्यंत पावसाची नोंद झाली आहे.
पिकांना मात्र फटका
पावसाची तूट भरून निघाली असली तरी या संततधार पावसाने पिकांना मात्र फटका बसला. शेतातील पाण्याचा निचरा न होणे सतत ओलावा राहणे यामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. किडीचाही प्रादुर्भाव झाला. पिकं पिवळी पडली.
मूग, उडीद, चवळी व सोयाबीनचे पीक तर अनेक ठिकाणी सडले. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याचे चित्र नंदुरबार तालुक्यातील पूर्व भाग, शहादा, तळोदा तालुक्यात दिसून आले. जी पिकं थोडीफार वाचली आहेत त्यांची उत्पादकता २५ ते ३० टक्क्यांनी कमी झाली आहे. यामुळे शेतकºयांच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे.
प्रशासनाकडून दखल नाही
पावसामुळे खबार झालेली पिकं, झालेले नुकसान याबाबत मात्र प्रशासनाकडून दखल घेतली गेली नसल्याचे चित्र आहे. लोकप्रतिनिधींनी देखील याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे शेतकºयांमध्ये नाराजीची भावना आहे.
गेल्या वर्षी देखील सरासरीचा अधीक पाऊस झाला होता. पिकं परिपक्वहोण्याच्या कालावधीतच पावसाची संततधार कायम राहिल्याने नुकसान झाले होते.
यंदा देखील पाऊस सरासरी ओलांडणार अशी शक्यता आहे. पावसाचे आणखी तीन आठवडे शिल्लक आहे. परतीचा पाऊस हा मुसळधार स्वरूपाचा असतो. त्यामुळे पावसाच्या आकडेवारीत भर पडणार आहे.त्याचा फायदा मात्र रब्बी पिकाला होणार आहे.