शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

आश्वासने हवेतच, नेत्यांनाही पडला विसर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 12:26 PM

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार जिल्हा निर्मिती व त्यापूर्वीच्या काळात अर्थात गेल्या तीन दशकात परिसराच्या ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार जिल्हा निर्मिती व त्यापूर्वीच्या काळात अर्थात गेल्या तीन दशकात परिसराच्या विकासासाठी अनेक नव्या प्रकल्पांची घोषणा नेत्यांनी केली असली तरी या तीन दशकात त्या योजना मात्र प्रत्यक्षात आकारास आलेल्या नाहीत. गंमतीची बाब म्हणजे या घोषणा आता नेत्यांच्या राजकीय अजेंड्यावरुनही गायब झाल्या आहेत. सोमवारी जागतिक विसरभोळे दिवस साजरा होत असताना या घोषणांची मात्र प्रकर्षाने जनतेला आठवण येत आहे.नंदुरबार स्वतंत्र जिल्हा व्हावा यासाठी जिल्हा निर्मितीची मागणी ७० च्या दशकात सुरू झाली. प्रत्यक्षात मात्र जिल्हा निर्मितीचे स्वप्न १९९८ ला साकार झाले. पण जिल्हा निर्मितीच्या विषयामुळे परिसरातील विकासातील अनेक प्रश्न चर्चेत आले. जिल्हा निर्मितीची मागणी होत असतानाच या नव्या जिल्ह्यात मोलगी आणि म्हसावद हे दोन स्वतंत्र तालुके व्हावेत ही मागणी होती. १९९३ मध्ये स्व.गोपीनाथ मुंडे हे विरोधी पक्षनेते असताना नंदुरबार जिल्ह्यातील त्यांच्या सभांमध्ये हा विषय त्यांनी आवर्जून चर्चेत आणला होता. त्यानंतरही विधानसभा निवडणूक व लोकसभा निवडणुकीच्यावेळी सर्वच राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर हा विषय होता. नंदुरबार जिल्हा निर्मितीची मुहूर्तमेढ होत असताना त्यावेळी देखील यासंदर्भातील आश्वासने देण्यात आली. एवढेच नव्हे तर पिंपळखुटा, ता.अक्कलकुवा येथे तत्कालिन राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनीदेखील यासंदर्भातील आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हा विषयच चर्चेला आला नाही. किंबहुना त्याबाबतची चर्चाही आता थांबल्यासारखीच आहे.सातपुड्यातील वन्यजीव रक्षणासाठी ९० च्या दशकात वनविभागाने तोरणमाळ अभयारण्याचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाचे निमित्तही तेवढेच मोठे होते. कारण तोरणमाळला लागूनच मध्य प्रदेश शासनानेही नवीन अभयारण्याचा प्रस्ताव तयार केले होते. ते एकत्रित करून आशिया खंडातील सर्वात मोठे राष्टÑीय उद्यान साकारण्याचे हे स्वप्न होते. त्या काळातील दोन लोकसभा निवडणुकीत हा प्रश्न सर्वच राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर आला. आता मात्र त्याचा सर्वांनाच विसर पडला आहे. असाच एक सोलापूर-अहमदाबाद राष्टÑीय महामार्गाचा प्रश्नाची आठवण आता कुणालाही नाही. गेल्या चार वर्षात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक नवीन राष्टÑीयमहामार्ग घोषित केले. जिल्ह्यातील रस्त्यांचाही विस्तार व नवीन महामार्गाची घोषणा केली पण सातपुड्याच्या विकासाला चालना देणारा सोलापूर-अहमदाबाद राष्टÑीय महामार्ग मात्र दुर्लक्षित राहिला.नंदुरबारला औद्योगिक वसाहतीची घोषणा जिल्हा निर्मितीपूर्वी झाली. त्याचे दोनवेळा तत्कालिन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अखेर आता तिसऱ्यांदा जागा बदलून काम सुरू आहे. ही औद्योगिक वसाहत होण्यापूर्वीच येथे चिलीपार्क उभारण्याची घोषणा होती. आता जिल्ह्यातील मिरचीचे अस्तित्वच धोक्यात येत असताना चिलीपार्क कालबाह्य झाला. त्यानंतर डायमंड पार्कची घोषणा झाली. पण सुरतचा हिरा उद्योग संकटात आल्यानंतर ती घोषणाही बाजूला पडली.एकूणच जिल्ह्याच्या विकासासंदर्भातील अनेक योजना, अनेक घोषणा गेल्या तीन-साडेतीन दशकात झाल्या. काही अजूनही चर्चेत तग धरुन आहेत तर काही मात्र काळाच्या पडद्याआडच विस्मृतीला जात आहेत. जागतिक विसरभोळे दिनानिमित्त नव्याने हे प्रस्तावित प्रकल्प नेत्यांच्या स्मृतीत यावेत, अशी अपेक्षा जिल्हावासी व्यक्त करीत आहेत.