शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
2
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
3
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
4
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
5
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
6
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
7
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
8
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
9
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
10
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
11
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
12
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
13
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
14
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
15
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
16
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
17
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
18
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
19
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
20
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत

जिल्ह्यात राष्टÑवादी एकदिलाने काम करेल ‘मिशन २०२४’ चे आतापासूनच काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 12:22 PM

माझी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली तेव्हापासूनच जिल्ह्यातील राष्टÑवादीतील अंतर्गत गट, तट मिटले आहेत. -डॉ.अभिजीत मोरे.

संडे स्पेशल मुलाखत-

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार जिल्ह्यात गेल्या दीड वर्षापासून रिक्त असलेले राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपदी अखेर डॉ.अभिजीत मोरे यांची निवड झाली आहे. या निवडीने जिल्ह्यातील राजकारणात आता नव्याने समिकरणे बदलणार आहेत. दरम्यान, जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे स्विकारल्यापासून २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका हेच आपले लक्ष असून त्या कामाला आतापासूनच सुरुवात केल्याची माहिती डॉ.अभिजीत मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.आपली राजकारणाची नवी दिशा कशी राहणार?माझ्या घराण्याला राजकारणाचा वारसा आहे. यापूर्वी आपले वडिल स्व.दिलिप मोरे व आजी स्वातंत्र्य सेनानी स्व.कमलाताई मराठे यांनी राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाची धूरा यशस्वीपणे सांभाळली. आपणही युवक राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष होतो. आपल्या आजीच्या कारकिर्दीत राष्टÑवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर पोहचला होता. नंतरच्या काळात संघटनात्मक बांधणी खिळखिळी झाली होती. पण आता पुन्हा नव्या दमाने कामाला सुरुवात करून राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील पूर्वीचे वैभव परत आणण्याचा संकल्प आहे. आपण सूत्रे स्विकारल्यापासून कामाला सुरुवात केली असून त्या दृष्टीने जिल्हाभर पक्षाची नव्याने बांधणी करणार आहोत.पक्षातील गटबाजीचे चित्र नेहमीच चर्चेत राहिले आहे ते कसे मिटविणार?पक्षात गटबाजी नव्हती. खरेतर जिल्हाध्यक्षपदासाठी स्पर्धा होती हे निश्चित ही स्पर्धा म्हणजे गटबाजी म्हणता येणार नाही. माझी नियुक्ती झाली तेंव्हापासूनच स्पर्धाही संपली असून किरकोळ मतभेद असतील तेही मिटले आहेत. माझ्या नियुक्तीनंतर सर्वच जण आम्ही एकत्र भेटलो असून संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने विचार केला आहे. त्यामुळे पक्षात कुठलेही मतभेद अथवा गटबाजी नाही. सर्व जण एकदिलाने काम करणार आहोत.‘मिशन २०२४’ च्या नियोजनासंदर्भात डॉ.अभिजीत मोरे यांनी सांगितले की, आजपासूनच आम्ही जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात व लोकसभा मतदारसंघात पक्ष बांधणीसाठी काम करणार आहोत. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ही सर्व व्यूहरचना असणार आहे. पुढे पक्षाच्या आदेशानुसार विधानसभा मतदारसंघ व लोकसभा निवडणुकीचे नियोजन करण्यात येईल. त्यावेळी कुठे निवडणूक लढवावी त्याची दिशा स्पष्ट होईल.केवळ लोकसभा व विधानसभा निवडणुकाच नव्हे तर ग्रामपंचायतीपासून नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही राष्टÑवादी काँग्रेस पक्ष सक्षमपणे निवडणूक लढवू शकेल असे नियोजन राहणार आहे. मध्यंतरीच्या काळात कोण पक्ष सोडून गेले, त्याचे विचार करण्यापेक्षा पक्षात अनेक नवीन कार्यकर्ते येऊ इच्छित आहेत. त्याबाबत विचार करू.