लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सोने-चांदीचे दर कमी झाल्याने बाजारात ग्राहक परतला असून उलाढाल बऱ्यापैकी वाढली असल्याची स्थिती आहे़ बाजारात निर्माण झालेल्या स्थिरतेमुळे आगामी काळात सकारात्मक परिणाम दिसून येतील असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे़गेल्या काही दिवसात सोन्या चांदीचे दर वाढू लागल्याने सराफ बाजारातील दुकानांमध्ये सोने चांदीचे दागिने घडवून घेणे तसेच खरेदी करण्यापेक्षा मोड देऊन पैसे करण्यावर भर दिला जात असल्याचे चित्र होते़ यातून बाजारात खरेदी-विक्रीचे व्यवहार मंदावले होते़ परिणामी बाजाराचे आर्थिक चलनवलन धोक्यात आले होते़ परंतु गेल्या १५ दिवसात बाजारपेठेने कूस बदलली असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने चांदीचे दर कमी होणे तसेच कोरोना महामारीची धग काहीशी कमी होत असल्याचे जाणवू लागल्याने स्थानिक बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाला आहे़ गुरुवारी सोन्याच्या दरात ग्रॅममागे ५० रूपयांची घट आल्याची माहिती देण्यात आली़ दिवसभरात सोन्याचा दर हा प्रतीग्रॅम ५ हजार १०० तर चांदी प्रतिकिलो ५८ हजार ८०० रूपये होता़ या दरांमध्ये घट येणे किंवा वाढ होण्याची शक्यता नसल्याची माहिती व्यापाºयांनी दिली आहे़ दसºयापर्यंत बाजारात सोन्या-चांदीची खरेदी वाढणार असल्याने त्यादृष्टीने तयारी केल्याची माहिती व्यापाºयांकडून देण्यात आली़दरम्यान अधिकमासानिमित्त चांदी खरेदी होत असल्याने उलाढाल पूर्ववत होत असल्याची माहिती देण्यात आली आहे़ चांदीच्या विविध वस्तू खरेदी करण्यासाठी महिला बाजारात येत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले़ नंदुरबार शहरात सरासरी दिवसभरात ७५ लाख रूपयांची उलाढाल सोने व चांदी खरेदीतून होत असल्याची माहिती आहे़
बाजारात सोने-चांदीचे दर कमी झाल्याने ग्राहक खरेदीसाठी परतला आहे़ हे दर येत्या काळापर्यंत स्थिर राहणार आहेत़ यातून बाजारपेठेला चांगला फिडबॅक मिळेल़ बाजारपेठेला येत्या काळात चांगले दिवस येतील ही शक्यता यातून निर्माण होत आहे़-जगदीश सोनी, सोने-चांदी व्यावसायिक, नंदुरबाऱ