शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पालिका प्रशासनाशी चर्चा करूनच रस्त्याचे पुढील काम करणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:32 IST

मंगळवारी ‘लोकमत’मध्ये कलसाडी ते मालकातर रस्ता तांत्रिकदृष्ट्या योग्य प्रकारे होत नसल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. असे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर ...

मंगळवारी ‘लोकमत’मध्ये कलसाडी ते मालकातर रस्ता तांत्रिकदृष्ट्या योग्य प्रकारे होत नसल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. असे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर याबाबत पालिका प्रशासनाची भूमिका मांडताना मुख्याधिकारी राहुल वाघ म्हणाले की, सदर महामार्ग हा शहादा शहरातून जाणार आहे. यात प्रामुख्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते बिरसा मुंडा चौक हा भाग काँक्रिटीकरण तर त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पाडळदा चौफुली असा मार्ग असून येथे डांबरीकरण केले जाणार आहे. हे दोन्ही महत्त्वाचे भाग असून कृती व विकास आराखड्यातील नियम व तरतुदीनुसार भविष्यातील वाहतुकीची कोंडी लक्षात घेता या रस्त्याची निर्मिती करणे आवश्यक आहे.

पालिका हद्दीतील रस्त्यांची निर्मिती ही विकास आराखड्यातील तांत्रिक बाबी लक्षात घेऊन केली पाहिजे. त्याचप्रमाणे संबंधित रस्त्याची लांबी व रुंदी योग्य प्रकारे असणे अपेक्षित आहे. रस्त्याच्या निर्मितीच्या सुरुवातीला पालिका प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराकडे या महामार्गाचे नकाशे व आराखडे याची मागणी करूनही त्याची पूर्तता झालेली नाही. त्याचप्रमाणे दोन वेळा याबाबत पत्रव्यवहार करण्यात आल्यानंतरही याकडे दुर्लक्ष करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते बिरसा मुंडा चौकापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण झालेले आहे. ठेकेदार अथवा सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत योग्य प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही. वारंवार यासंदर्भात उच्चस्तरीय बैठकीची मागणी करूनही संबंधित बैठक झालेली नाही. परिणामी कुठल्याही ठोस चर्चेअंती एकतर्फी या रस्त्याच्या निर्मितीचे काम सुरू आहे.

भविष्यातील रहदारी व वाहनांची संख्या लक्षात घेता हा शहरातून बाहेर जाणारा मुख्य मार्ग असल्याने या मार्गाची रुंदी योग्य प्रकारे असावी. त्याचप्रमाणे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या गटारी या योग्य दर्जाच्या असाव्यात. सध्या शहादा न्यायालय व बसस्थानकाच्या कंपाउंडपासून रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारींची निर्मिती केली जात आहे, ती योग्य प्रकारची नाही. २०१९ मधील पावसाळ्यातील पूरस्थिती लक्षात घेता या संपूर्ण भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने पावसाचे पाणी न्यायालय परिसरात शिरल्याने मोठ्या प्रमाणात न्यायालयीन फायली व कागदपत्रांचे नुकसान झाले होते. या रस्त्यांची निर्मिती करताना भूतकाळात घडलेल्या या घटनांचा विचार करून भविष्यात या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याची तरतूद करूनच रस्त्यांची निर्मिती करणे आवश्यक असतानाही ठेकेदार त्याच्या हिशेबाने काम करीत आहे तर सार्वजनिक बांधकाम विभाग व पाटबंधारे विभाग या दोन्ही विभागांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले असल्याने या रस्त्याच्या निर्मितीनंतर पावसाळ्यात अनेक समस्या होण्याची शक्यता असल्याने यावर वेळीच उपाययोजना होणे गरजेचे आहे. अन्यथा याचे दुष्परिणाम भविष्यात शहादेकरांना सोसावे लागतील.

दरम्यान, संबंधित ठेकेदाराने बसस्थानकापासून ते न्यायालयासमोरपर्यंत एका बाजूला गटारीसाठी खोदकाम केलेले आहे. ठेकेदाराने या गटारीची निर्मिती तत्काळ करणे आवश्यक असतानाही गेल्या महिनाभरापासून कुठलेही सबळ कारण नसताना अथवा कुठलीही पूर्वसूचना न देता या गटारींची निर्मिती थांबवली असल्याने हा भाग अपघातप्रवण क्षेत्र झालेला आहे. मुळात येथील धावपट्टीची रुंदी ही विकास आराखड्यात नमूद केल्याप्रमाणे नसल्याने अनेकांनी याबाबत बांधकाम विभागाकडे तक्रार केली आहे. या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना कसरत करावी लागते तर दुसऱ्या बाजूला गटारीसाठी खोल खड्डा असल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालक वाहनासकट या खड्ड्यात पडण्याची शक्यता सर्वाधिक आहे. ठेकेदाराने या गटारींची निर्मिती करताना कुठलेही बॅरिकेड्स अथवा तत्सम उपाययोजना केली नसल्याने भविष्यात या भागात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या संपूर्ण रस्त्यादरम्यान असलेले अतिक्रमण काढण्यासाठी पालिका प्रशासन निश्चितच सहकार्य करेल. यासाठी ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाने पालिकेशी चर्चा केली पाहिजे. मात्र या मार्गाची निर्मिती करताना विकास आराखड्यातील तरतुदीनुसार झाली पाहिजे अन्यथा हा रस्ता अनेक समस्यांचे माहेरघर ठरेल. सध्या एका बाजूला गटारीचे काम थांबले असल्याने या भागात अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग व पाटबंधारे विभागाने पालिका प्रशासनाशी चर्चा करूनच याबाबत योग्य तो निर्णय घेणे अपेक्षित आहे.

- राहुल वाघ, मुख्याधिकारी, शहादा नगरपालिका