शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे शेतकऱ्यांची ‘मेहनत’ पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात सलग सुरू असलेल्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे़ शेतात पाणी साचल्याने पिके ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात सलग सुरू असलेल्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे़ शेतात पाणी साचल्याने पिके सडू लागली असून पावसाचा जोर कायम राहिल्यास मोठ्या नुकसानीची भिती व्यक्त होत आहे़
गत आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे़ सोबत वादळी वारेही जोर धरत असल्याने पिके जमीनदोस्त झाली आहेत़ ऊस, कापूस, सोयाबीन, ज्वारी, भात आदी धान्य पिकांसह तेलबिया आणि कडधान्य पिकांची वाताहत झाली आहे़ या पिकांचे पंचनामे करण्यासाठी मंगळवारपासून महसूल आणि कृषी विभागाचे पथक नियुक्त करण्यात आले असून त्यांच्याकडून येत्या चार दिवसात पंचनामे पूर्ण करुन अहवाल जिल्हा प्रशासनाला सोपवला जाईल़ दरम्यान नंदुरबार, तळोदा, नवापूर आणि शहादा तालुक्यात पावसामुळे कोरड आणि बागायती अशा दोन्ही क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत़ येत्या दोन दिवसात पाऊस कायम राहिल्यास हाती येऊ शकणाऱ्या उत्पन्नापासूनही शेतकरी मुकणार असल्याची माहिती शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिली आहे़ जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या १०८ टक्के पाऊस झाला आहे़ दररोज दुपारी चार ते मध्यरात्री १२ पर्यंत वादळी वाºयासह पाऊस येत आहे़ जिल्ह्यात १ लाख २२ हजारपेक्षा अधिक क्षेत्रात लागवड केलेल्या कापूस पिकाला बोंडे आली आहेत़ वादळामुळे बोंडे झाडाखाली कोसळून नुकसान झाले आहे़ दुसरीकडे धान्य पिके जमिनदोस्त झाली आहेत़ आधीच शेतात साचलेल्या पाण्यात कणसासह कडबाही सडू लागला असल्याचे चित्र आहे़ ज्याठिकाणी कापूस बोंडे फूटून बाहेर आली होती़ त्या शेतांमध्ये पाणी साचले आहे़ परिणामी झाडांवर मर येऊन फुटलेला कापूस सडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे़ हे सर्व नुकसान पाहून शेतकरी हताश झाले आहेत़


नंदुरबार तालुक्यातील कोरीट महसूल मंडळातील गावांमध्ये शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे़ नाल्याचे पाणी शेतात शिरल्याने काही ठिकाणी पिके वाहून गेली आहेत़ अनेक ठिकाणी आठ दिवसांपासून जमिन पाण्याखाली गेली असल्याने नुकसान वाढत आहे़ या नुकसानीचा आढावा प्रशासनाने घ्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे़
जिल्ह्यातील एकूण ३६ महसूली मंडळात सलग सात दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नुकसान झाल्याची माहिती आहे़ या पार्श्वभूमीवर कृषी विभाग कृषी सहायक व पर्यवेक्षक यांच्या माध्यमातून पंचनाम्यांच्या प्रक्रियेला गती देत आहेत़