शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
4
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
5
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
6
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
7
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
8
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
9
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
10
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
11
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
12
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
13
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
14
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
15
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
16
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
17
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
18
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
19
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
20
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे धुळे, नाशिक शिरपूर, त्र्यंबकेश्वरला परीक्षा केंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 12:34 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील पाच हजारापेक्षा अधीक विद्यार्थी यंदा सीईटी परीक्षा देणार आहेत. त्यांचे केंद्र धुळेसह इतर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील पाच हजारापेक्षा अधीक विद्यार्थी यंदा सीईटी परीक्षा देणार आहेत. त्यांचे केंद्र धुळेसह इतर ठिकाणी राहणार असल्याने अशा विद्यार्थ्यांना परीक्षा केद्रांत जाण्यासाठी जादा बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती एस.टी.तर्फे देण्यात आली.वाहतूक सेवेअभावी विद्यार्थी सीईटी सामाईक परिक्षेला मुकणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सुचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्या अनुषंगाने एस.टी.महामंडळातर्फे जादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. १ ते ९ आॅक्टोबर दरम्यान ही परीक्षा होणार आहे. त्यासाठी जादा बसेस सोडल्या जातील. नंदुरबार जिल्ह्यातून एकुण पाच हजार २४७ विद्यार्थी सीईटीसाठी बसले आहेत. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र हे धुळे, शिरपूर व नाशिक येथे आहेत. त्यामुळे त्या त्या दिवशी जादा बसेस सोडल्या जातील .१ आॅक्टोबर रोजी धुळे केद्रावर २८२, नाशिक ३११तर त्र्यंबकेश्वर केंद्रावर ७ परिक्षार्र्थींची सोय करण्यात आली आहे. २ रोजी धुळे येथे ३७४, नाशिक येथे ३६१ तर त्र्यंबकेश्वर येथे १३ परिक्षार्थी, ४ आॅक्टोबर रोजी धुळे येथे ३३८, नाशिक येथे २८१ तर त्र्यंबकेश्वर येथे १६. ६ आॅक्टोबर रोजी धुळे येथे ३२२, शिरपूर येथे ३९, नाशिक येथे ३०५ तर त्र्यंबकेश्वर येथे १६ परिक्षार्थी. ७ आॅक्टोबर रोजी धुळे येथे १३२, शिरपूर येथे ४१, नाशिक येथे ३०८ तर त्र्यंबकेश्वर येथे १५ परिक्षार्थी. ८ आॅक्टोबर रोजी धुळे येथे २५४, शिरपूर येथे ३८, नाशिक येथे ३०४ तर त्र्यंबकेश्वर येथे १२ परिक्षार्थी. ९ आॅक्टोबर रोजी धुळे येथे २६९, शिरपूर येथे ३६, नाशिक येथे ४६१ तर त्र्यंबकेश्वर येथे १५ परिक्षार्र्थींची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.एकुण धुळे येथे २,३५०, नाशिक येथे २,६३८, शिरपूर येथे १५५ तर त्र्यंबकेश्वर येथे १०४ विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यातील चारही आगारातून जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना या बसेसचा फायदा घ्यावा असे आवाहन धुळे विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांनी केले आहे.

कोरोनामुळे यंदा जिल्ह्यातील परीक्षा केंद्र यंदा रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे धुळे, शिरपूर, नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना वाहतुकीची साधने उपलब्ध व्हावी यासाठी एस.टी.महामंडळातर्फे १ ते ९ आॅक्टोबरपर्यंत जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.