शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुवा शहरात स्वच्छतेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:56 IST

हातपंप लावण्यासाठी ग्रामस्थांचा पाठपुरावा धडगाव : तालुक्यातील १५० च्या जवळपास पाड्यांवर यंदा पाणीटंचाई राहणार असल्याची शक्यता आहे. यामुळे पाड्यांवर ...

हातपंप लावण्यासाठी ग्रामस्थांचा पाठपुरावा

धडगाव : तालुक्यातील १५० च्या जवळपास पाड्यांवर यंदा पाणीटंचाई राहणार असल्याची शक्यता आहे. यामुळे पाड्यांवर हातपंप नव्याने लावण्याची मागणी करण्यात आली आहे. जुनाट हातपंप दुरुस्त होणे शक्य नसल्याने जिल्हा परिषदेने नवीन हातपंप देण्याची गरज आहे.

हायमास्टचा प्रश्न मार्गी लावा

धडगाव : तालुक्याच्या दुर्गम व अति दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये हायमास्ट आणि पथदिवे नादुरुस्त झाले आहेत. संबंधित ठेकेदाराने मंजूर केल्यानंतर सहा महिनेही हे पथदिवे व हायमास्ट पूर्ण क्षमतेने चालू शकले नाहीत, यामुळे त्यांची दुरुस्ती करावी अन्यथा नवीन हायमास्ट लावण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आरोग्य केेंद्राच्या आवारातील अंधारामुळे सर्पदंशाची भीती आहे.

कोरडी झाडे जैसे थे

नंदुरबार : गुजरात राज्यातील वाका ते नंदुरबार दरम्यान कोरड्या झाडांचा प्रश्न कायम आहे. ही झाडे कोसळून अपघात होण्याची भीती आहे. यापूर्वी या झाडांना आगी लावून ती कोरडी करण्यात आली आहेत. ही झाडे प्रशासनाने काढून त्याजागी वृक्षारोपण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

लांडग्यांची झुंड

नंदुरबार : तालुक्याच्या पूर्व भागातील न्याहली ते कोपर्लीपर्यंतच्या वनक्षेत्रातील टेकड्यांवर लांडग्यांचा झुंड फिरताना दिसून येत आहे. या भागात अनेकांची शेती असून शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. याबाबत वनविभागानेही शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची अपेक्षा आहे.

मिरची पथारींवरील कामे अंतिम टप्प्यात

नंदुरबार : मिरची खरेदी-विक्रीचा हंगाम आटोपता झाला असून शहरातील मिरची पथारींवर व्यापाऱ्यांकडून अंतिम टप्प्यांची कामे सुरू आहेत. सुकवलेली मिरची कारखान्यांमध्ये पाठवण्यासह इतर कामांना सध्या गती देण्यात येत आहे. यंदा मिरची उत्पादन चांगले असले तरी रोग व इतर कारणांमुळे पथारीवर आवक कमी राहिली होती. यातून दर काहीअंशी वाढल्याची माहिती देण्यात आली आहे.

पाण्याचा वापर व्हावा

नंदुरबार : तालुक्यातील धरणे व गावतलावांमध्ये अद्यापही मुबलक पाणीसाठा आहे. या पाण्याचा वापर शेतीसाठी व्हावा यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत. यामुळे जलसंपदा विभागाने धरणातील पाणी द्यावे यासाठी शेतकरी त्या कार्यालयांमध्ये चकरा मारत असल्याचे दिसून येत आहे.

टरबुजांची आवक

नंदुरबार : ऊन वाढू लागताच बाजारानेही कूस बदलली असून उन्हाळी टरबूज दाखल होऊ लागले आहेत. तालुक्यातील विविध भागात लागवड करून उत्पादित करण्यात आलेल्या या गोड टरबुजांना मागणी आहे. व्यापारी शेतबांधावर जाऊन टरबुजांची खरेदी करत असल्याची माहिती आहे.