शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

ठाणेपाडालगतचे ३०० हेक्टर जंगल जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2021 12:37 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील ठाणेपाडा शिवारातील राखीव वनक्षेत्राला आग लागून ३०० हेक्टरचे जंगल जळून खाक झाले. सोमवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील ठाणेपाडा शिवारातील राखीव वनक्षेत्राला आग लागून ३०० हेक्टरचे जंगल जळून खाक झाले. सोमवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास लागलेली आग मंगळवारी सकाळी आठ वाजता आटोक्यात आली. नंदुरबार ते साक्री रस्त्यालगत वनविभागाची ठाणेपाडा गावाजवळ रोपवाटिका आहे. या रोपवाटिकेपासून साक्री तालुक्यातील सिंदबनपर्यंत ६०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात विस्तीर्ण असे वनक्षेत्र आहे. रोपवाटिकेलगत वनविभागाने ४०० हेक्टर वनक्षेत्र राखीव ठेवत त्याठिकाणी बांबू रोपवन व गवताची लागवड केली होती. सोमवारी रात्री ११. ३० वाजेच्या सुमारास या राखीव वनक्षेत्रात आग लागल्याचे ठाणेपाडा ग्रामस्थांना दिसून आले. अवघ्या काही वेळात ही आग फोफावून आसपास जंगलात वाढत गेली. ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिका-यांना माहिती दिल्यानंतर सहायक वनसंरक्षक धनंजय पवार, वनपरिक्षेत्रत अधिकारी मनोज रघुवंशी यांच्यासह वनपाल आणि वनरक्षक घटनास्थळी दाखल झाले होते. वनविभागाचे कर्मचारी व ठाणेपाडा गावातील ग्रामस्थ यांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु होता. परंतू जोरदार हवेमुळे आग पसरत राहिल्याने आटोक्यात आणणे मुश्किल होत होते. अग्नीशमन बंब बोलावूनही फरक पडत नसल्याने जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार तसेच ठाणेपाडा गावचे यांच्यासह ग्रामस्थांनी धाडस करुन वनकर्मचा-यांसोबत गवताळ भागात खोदकाम तसेच गवत कापणी सुरु करत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ३०० पेक्षा अधिक ग्रामस्थांनी पहाटेपासून गवत कापण्यास सुरुवात केल्याने सकाळी आठ वाजता आग आटोक्यात आली. आगीत बांबू रोपवन व गवत जळून खाक झाले असून वन्यप्राणी यातून बचावले असल्याचे सांगण्यात आले आहे. या जंगलात दोन बिबट, काळवीट, सायाळ आणि ५०० पेक्षा अधिक मोर आहेत.