शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक वन दिवस; ग्रीन कव्हर; विदर्भात घटले, राज्यात वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 07:00 IST

Nagpur news वनसंपदेची भिस्त असलेल्या विदर्भातील वनक्षेत्र जवळपास १४६ चौरस किलोमीटरने घटल्याची नोंद स्टेट फॉरेस्ट सर्व्हेच्या २०१९च्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देस्टेट फॉरेस्ट सर्वेक्षणचा अहवाल पण वनसंपदेची भिस्त विदर्भावरच

निशांत वानखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यात वनसंपदेच्या संवर्धनासाठी सकारात्मक प्रयत्न होत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रातील ग्रीन कव्हरमध्ये ९७५ चौरस किलोमीटरची वाढ नोंदविण्यात आली आहे. मात्र, ही वाढ केवळ ओपन फॉरेस्टमध्ये झाली आहे. संरक्षित वनक्षेत्र मात्र घटले असल्याचे दिसते. त्यातही वनसंपदेची भिस्त असलेल्या विदर्भातील वनक्षेत्र जवळपास १४६ चौरस किलोमीटरने घटल्याची नोंद स्टेट फॉरेस्ट सर्व्हेच्या २०१९च्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत किमान २५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक वनक्षेत्र असणे अपेक्षित आहे. मात्र, राज्यातील वनक्षेत्र अद्यापही क्षेत्रफळाच्या तुलनेत केवळ २० टक्के आहे. उल्लेखनीय म्हणजे २००९पासून १० वर्षांच्या आकडेवारीनुसार अत्यंत घनदाट व मध्यम घनदाट जंगलाच्या क्षेत्रात सातत्याने घट नोंदविण्यात आली आहे. वृक्षारोपणाच्या मोहिमेमुळे नागरी भागात ग्रीन कव्हर वाढले असले, तरी जंगलातील ग्रीन कव्हर कमी झाल्याचे दिसून येते. धक्कादायक म्हणजे विदर्भातील वनक्षेत्रात घट झालेली आहे. त्यातही गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यातील वनक्षेत्रात झालेली कमतरता चिंतेची बाब आहे.

गडचिरोलीत सर्वाधिक घटले जंगल

जिल्हा            भूभाग एकूण वनक्षेत्र तफावत

गडचिरोली १४४१२            ९९१६.९४            - ८७.०६

चंद्रपूर ११४४३            ४०५४.४६ - ३२.५४

नागपूर ९८९२             २०००.३८ - १८.६२

भंडारा ४०८७             ९९८.९२ - ७.०८

बुलडाणा ९६६१             ५९१.६०            - ३.४०

वाशिम ४९०१             २९६.७०            - २.२४

याशिवाय अमरावती व वर्धामध्ये साधारण घट झाली आहे. मात्र, गोंदियामध्ये १५.५९ चौरस किलोमीटर, अकोलामध्ये १.३७ चौरस किलोमीटर व यवतमाळमध्ये १.३२ चौरस किलोमीटरची वाढ नोंदविण्यात आली आहे.

१० वर्षांची तुलना (महाराष्ट्राचे क्षेत्रफळ ३,०७,७१३ चौरस किलोमीटर)

वर्ष             वनक्षेत्र (चौरस किलोमीटर)

२००९             ५०,६५०

२०११             ५०,६४६

२०१५             ५०,६२८

२०१७             ५०,६०४

२०१९             ५०,७७७.५६

राज्यातील वनक्षेत्राबाबत महत्त्वाचे बिंदू

- झुडपी जंगल धरून ६१,५७९ चाै.किमी. वनक्षेत्र. ८० टक्के आरक्षित, १० टक्के संरक्षित वनक्षेत्र.

- १६१३९ चाै.किमी. नाेंदणीकृत जंगलाबाहेरील वनक्षेत्र.

- १७० प्रजातीचे वृक्ष, १३५ प्रजातीची झुडपे व ५४ प्रजातीच्या औषधी वनस्पती आहेत.

- २९,९४७ हेक्टरमध्ये ६८६ नैसर्गिक जलस्त्राेत. ७३,०६२ हेक्टरमध्ये ४२५७ मानवनिर्मित पानवठे.

- ५६,३७,३९२ हेक्टर वनक्षेत्रात २.०७ टक्के जलस्त्राेत.

- २६०४४ हेक्टर म्हणजे ३९ टक्के वनक्षेत्र अति, तीव्र व मध्यम वणवा प्रवण क्षेत्र.

- २६५१५ चाै.किमी. एकूण हिरवळ क्षेत्र बांबू लागवडीने व्यापले आहे, जे ९.५५ टक्के आहे.

- ९५.३९ लाख टन जळाऊ लाकूड, १५.७१ काेटी टन चारा, १.२८ लाख टन बांबू, ८.६२ लाख टन इतर उपयाेगी लाकडे वनक्षेत्रामधून जवळचे ग्रामस्थ उपयाेगात आणत असतात.

टॅग्स :forestजंगल