शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

‘कॉर्निआ रिसर्च लेबॉरेटरीज’ची प्रतीक्षा कधी संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:22 IST

नागपूर : जगात साधारण तीन कोटी ९० लाख अंधव्यक्ती आहेत. जवळपास एक कोटी ५० लाख केवळ भारतात आहे. ...

नागपूर : जगात साधारण तीन कोटी ९० लाख अंधव्यक्ती आहेत. जवळपास एक कोटी ५० लाख केवळ भारतात आहे. यात १ लाख २० हजार लोकांना दरवर्षी बुबुळासंबंधी अंधत्व येते. मात्र सुमारे ५० हजार नेत्रदान होते. मेडिकलचा नेत्ररोग विभागाने यात पुढाकार घेत अंधत्वावर मात करण्यासाठी ‘कॉर्निआ रिसर्च लेबॉरेटरीज’चा प्रस्ताव तयार करून अधिष्ठात्यांकडे पाठविला होता. अधिष्ठाता बदलेले मात्र तीन वर्षांपासून हा प्रस्ताव पुढेच सरकला नाही. पालकमंत्री नितीन राऊत यांनी यात पुढाकार घेतल्यास ही ‘लॅब’ तयार होऊन एका नेत्रदानातून तीन रुग्णांमध्ये बुबूळ प्रत्यारोपण करणे शक्य होईल, असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

अलीकडे नेत्रदानाचे प्रमाण वाढले असलेतरी नेत्रदानाबद्दलच्या समाजाच्या चुकीच्या मान्यतेमुळे मृत्यूनंतर पन्नास टक्केही नेत्रदान होत नाही. भारतात दरवर्षी ८४ लाख लोक मृत्युमुखी पडतात. मात्र यातील ४९ हजार ५१० म्हणजे ०.५८ टक्केच नेत्रदान होते. यामुळे एका नेत्रदानातून तीन रुग्णांमध्ये बुबूळ प्रत्यारोपणाची प्रक्रिया होणे आवश्यक असून यासाठी मेडिकलच्या नेत्ररोग विभागाने तीन वर्षांपूर्वी ‘कॉर्निआ रिसर्च लेबॉरेटरीज’चा प्रस्ताव तयार केला. तत्कालीन अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्याकडे हा प्रस्ताव पाठविला. त्यांनीही यासाठी पुढाकार घेतला होता. परंतु प्रस्तावित जागेवर ‘दीनदयाल थाळी’ प्रकल्प उभारण्यात आल्याने हा प्रस्ताव मागे पडला. त्यानंतर अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी नव्याने प्रस्ताव तयार करण्यास सांगितले. परंतु त्यानंतरही हा प्रस्ताव पुढे गेला नाही. सध्या कोरोनाचा काळ असल्याने २०१९च्या तुलनेत २०२०मध्ये २५ टक्केही नेत्रदान झाले नाही. यामुळे बुबुळांच्या प्रत्यक्षात असलेल्यांची यादीत वाढ झाली आहे.

- बुबूळ प्रत्यारोपणाची संख्या वाढविण्यासाठी ‘लॅब’ची गरज

बुबुळावर पाच स्तर असतात. यातील वरील दोन स्तर खराब झालेले असलेतरी उर्वरित तीन स्तराचा उपयोग अंधत्व दूर करण्यासाठी केला जातो. यासाठी ‘कॉर्निआ रिसर्च लेबॉरेटरीज’च्या माध्यमातून ही ‘लॅमीलर केरॅटोप्लास्टी’ करणे शक्य असते. संपूर्ण बुबूळ प्रत्यारोपणाच्या तुलनेत ‘लॅमीलर केरॅटोप्लास्टी’ शस्त्रक्रियेचा यशाचा दर दुप्पट असतो. या शिवाय, ‘लेबॉरेटरीज’मुळे २० दिवसांपर्यंत बुबूळ ‘फ्रीज’ करणे शक्य होईल. सोबतच पीजीच्या विद्यार्थ्यांना नवे संशोधन करण्यास वाव मिळून याचा फायदा रुग्णाला होऊ शकेल, असेही तज्ज्ञाचे म्हणणे आहे.