शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भाशिवाय पर्याय नाही

By admin | Updated: March 15, 2015 02:28 IST

विदर्भाच्या विकासासाठी शासनाने दिलेली आश्वासने व त्यासाठी नेमलेल्या विविध समित्या आजवर धूळफेकच करीत आल्या आहेत.

नागपूर : विदर्भाच्या विकासासाठी शासनाने दिलेली आश्वासने व त्यासाठी नेमलेल्या विविध समित्या आजवर धूळफेकच करीत आल्या आहेत. या समितींच्या माध्यमातून विदर्भाचा विकास आता अशक्य असून आता विदर्भाचे स्वतंत्र राज्य हाच एकमेव पर्याय आहे, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी येथे शनिवारी केले. विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे सीताबर्डी स्थित हिंदी मोरभवन येथील मधुरम सभागृहात आयोजित ‘केळकर समितीचा अहवाल आणि स्वतंत्र विदर्भ राज्याची आवश्यकता’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केळकर समितीच्या अहवालाचे संक्षिप्तपणे विश्लेषण करतांना सांगितले, केळकर समिती नेमल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते की, आता आपण अनुशेषाची भाषा बदलून विकासाची भाषा बोलली पाहिजे. केळकर समितीने तेच सूत्र स्वीकारून विकासातील तूट, सरासरी पासून अंतर, तफावत इत्यादी शब्द वापरून विकासाची रचना मांडली आहे. मुंबई-ठाणे, पुणे-नाशिक येथेच औद्योगिक केंद्रीकरण झाले. ते कमी करण्याचे उपाय समितीने सुचविले नाही. वैदर्भीय जनतेमध्ये शासकीय धोरणांविषयी प्रचंड संताप आहे. शासनाने विश्वासघात केल्याची लोकांमध्ये भावना आहे.सोबतच समितीने तडजोड करण्याची प्रवृतीत, महाराष्ट्राप्रति बांधिलकी, महाराष्ट्राच्या स्वप्नासाठी पुन्हा समर्पित होण्याची वृत्ती, महाराष्ट्राच्या पुनर्विचाराची आवश्यकता, अशा आशयाच्या शिफारशींचे समर्थन केले आहे. त्यामुळे केळकर समिती केवळ एक सापळा आहे. असे स्पष्ट करीत विदर्भातील जनतेने या सापळ्यापासून सावध होऊन केळकर समितीचा अहवाल नाकारावा आणि स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याची ठामपणे मागणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. राम नेवले यांनी प्रास्ताविक केले. दिलीप नरवडिया यांनी संचालन केले. माजी मंत्री मधुकरराव किंमतकर, ज्येष्ठ समाजसेवी उमेश चौबे, राम नेवले, डॉ. रमेश गजबे, अरुण केदार, प्रबीरकुमार चक्रवर्ती, धर्मराज रेवतकर, सरोज काशीकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)