शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

चूक यंत्रणेची, वनवास विद्यार्थ्यांना ! 'नीट'च्या खेळखंडोब्यानंतर विद्यार्थ्यांनी वक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 16:00 IST

Nagpur : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) नीट-यूजी २०२६ परीक्षा रद्द करण्यात आल्याने देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसह नागपूर आणि विदर्भातील विद्यार्थ्यांमध्येही निराशा पसरली असून, संताप व्यक्त केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) नीट-यूजी २०२६ परीक्षा रद्द करण्यात आल्याने देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसह नागपूर आणि विदर्भातील विद्यार्थ्यांमध्येही निराशा पसरली असून, संताप व्यक्त केला जात आहे. परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता व चांगले गुण मिळण्याचा विश्वासही होता.

'अॅन्सर की' मिळाल्यानंतर हा विश्वास वाढला होता. एकतर अनेक महिन्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आणि पुन्हा तयारी करावी लागण्याचा मानसिक ताण व संताप विद्यार्थ्यांसह पालकांमध्येसुद्धा आहे. नागपुरात १५ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी 'नीट' दिली होती.

विद्यार्थ्यांनी दिवसरात्र कष्ट घेऊन परीक्षा दिली होती. मात्र, आता पुनर्परीक्षेच्या निर्णयामुळे मानसिक तणाव वाढला आहे. सतत बदलणाऱ्या परिस्थितीमुळे अभ्यासाची लय बिघडत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

गेल्या वर्षी नागपूरशी जुळले होते तार

३ मे रोजी झालेल्या परीक्षेनंतर अनेक राज्यांतून पेपरफुटी आणि गैरप्रकारांच्या तक्रारी समोर आल्या होत्या. सध्या नाशिकमध्ये गैरप्रकाराचे केंद्र ग्राह्य धरले जात असले तरी गडचिरोलीमधूनही पेपर लिक झाल्याची माहिती पुढे आली होती. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर एनटीएने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता ही परीक्षा पुन्हा घेतली जाणार असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षीसुद्धा नीटचा पेपर फुटला होता व त्याचे तार नागपूरशी जुळले होते. यंदासुद्धा ही शक्यता तपासली जाण्याची शक्यता आहे

"परीक्षा रद्द व्हायला नको होती. दोन वर्षे सातत्याने मेहनत करून परीक्षा दिली होती. पेपरही चांगला गेला होता. आता पुन्हा परीक्षा देण्यासाठी नव्याने तयारी करावी लागणार आहे. दरवर्षी पेपरफुटीच्या घटना घडत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर व्यवस्था उभी करणे गरजेचे आहे. केवळ परीक्षार्थ्यांवर कडक नियम लादून सुधारणा होणार नाही."
- सारिणी इकरे, नीट परीक्षार्थी

"२०२४ मध्येही पेपरफुटी झाली होती. मात्र, त्यावेळी परीक्षा रद्द करण्यात आली नव्हती. यावेळी परीक्षा रद्द करण्यापूर्वी एनटीएने संपूर्ण प्रकरण स्पष्ट करायला हवे होते. या पेपरफुटीतून नेमक्या किती विद्यार्थ्यांना फायदा झाला, हेही जाहीर करणे आवश्यक होते. जर काही मोजकेच विद्यार्थी लाभार्थी असतील, तर सर्व विद्यार्थ्यांना त्रास देण्याची गरज काय ?"
- डॉ. समीर फाले, वैद्यकीय परीक्षा मार्गदर्शक

"परीक्षा रद्द करण्याचा निर्णय योग्य नाही. त्यामुळे मानसिक तणाव वाढणार आहे. काही ठिकाणी पेपरफुटी होत असेल तर त्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. परीक्षा दिल्यानंतर निकालाची प्रतीक्षा होती; पण अचानक परिस्थिती बदलली. आता पुन्हा अभ्यासाला लागावे लागणार आहे."
- अर्चेश वाघमारे, नीट परीक्षार्थी

English
हिंदी सारांश
Web Title : NEET Exam Cancelled: System Failure, Students Suffer, Outraged by Re-exam.

Web Summary : NEET-UG exam cancellation sparks outrage among students in Nagpur and Vidarbha. Students face mental stress and disrupted study schedules due to alleged paper leaks and re-exam decision. Students demand strict action against culprits.
टॅग्स :NEET Exam Paper Leakनीट परीक्षा पेपर लीकNEET Examनीट परीक्षाnagpurनागपूर