शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
5
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
6
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
7
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
8
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
9
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
10
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
11
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
12
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
13
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
14
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
15
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
16
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
17
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
18
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
19
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
20
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
Daily Top 2Weekly Top 5

संविधान वाचनाचा विक्रम

By admin | Updated: November 27, 2015 02:55 IST

संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला संविधान अर्पण केले. त्यानिमित्त हा दिवस संविधान दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो.

‘आम्ही भारताचे लोक’ : यशवंत स्टेडियमवर हजारो विद्यार्थ्यांचा सहभागनागपूर : संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला संविधान अर्पण केले. त्यानिमित्त हा दिवस संविधान दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. यंदा केंद्र आणि राज्य सरकारने सुद्धा संविधान दिन उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेत संपूर्ण देशात संविधानाचा जागर करण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी नागपुरातील यशवंत स्टेडियमवर आयोजित भव्य सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विद्यार्थ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून शपथ घेतली. तब्बल एक लाख २५ हजार विद्यार्थ्यांनी एकत्र येत संविधान वाचन करून एक नवा विक्रम प्रस्थापित केल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. राज्य शासनाचा सामाजिक न्याय विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि मैत्री परिवाराच्या सहकार्याने यशवंत स्टेडियम येथे संविधान दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर प्रवीण दटके, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, आ. अनिल सोले, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर देशमुख, आ. डॉ. मिलिंद माने, आ. नागो गाणार, आ. सुधाकर कोहळे, आ. विकास कुंभारे, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव उज्जल उके, समाज कल्याण आयुक्त पियुश सिंह, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, आदिवासी विभागाच्या अप्पर आयुक्त माधवी खोडे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, कुलसचिव डॉ. पुरण मेश्राम, समाज कल्याण विभागाचे विभागीय आयुक्त माधव झोड, सहाय्यक आयुक्त मंगेश वानखेडे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी एशिया बुक आॅफ रेकॉर्ड आणि लिम्का बुक आॅफ रेकॉर्डच्या प्रतिनिधी सुनीता क्षीरसागर-धोटे या आवर्जून उपस्थित होत्या. संविधानाच्या उद्देशिकेचे स्मृतिचिन्ह व तुळशीचे रोप देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी प्रास्ताविक केले. माधुरी यावलकर यांनी संचालन केले. राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आभार मानले. संविधानामुळेच देश महासत्ता होईल - मुख्यमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारताचे संविधान हे जगातील सर्वोत्कृष्ट संविधान असून या संविधानामुळेच भारत जागतिक महासत्ता होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. विद्यार्थ्यांना संविधानाची शपथ दिल्यानंतर ते मार्गदर्शन करीत होते. मुख्यमंत्री म्हणाले, संविधानाच्या उद्देशिकेत संपूर्ण संविधान सामावले आहे. संविधानाची प्रस्तावना आपल्या जीवनात अंगिकारल्यास भारताला महासत्ता होण्यास कुणीच रोखू शकणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाटचालसुद्धा संविधानानुसारच असल्याने देश प्रगतीपथावर आहे. राज्य शासनसुद्धा संविधानाला अनुसरून कार्य करेल आणि राज्याला विकसित करेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.संविधानाचा आत्मा बदलू शकतच नाही -गडकरीकेंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी हे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. त्यांचा रेकॉर्ड करून ठेवलेला संदेश यावेळी दाखविण्यात आला. यात ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान हे सर्वोत्कृष्ट आहे. संविधानाची उद्देशिका हा संविधानाची आत्मा आहे. ती कधीच बदलू शकत नाही. आज संविधानाच्या सामूहिक वाचनाच्या कार्यक्रमातून भविष्याची नवीन फळी निर्माण होईल, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला. सिने अभिनेते सिद्धार्थ जाधव विशेष आकर्षण सिने अभिनेते सिद्धार्थ जाधव, भारत गणेशपुरे, प्राजक्ता माळी आणि निशा परुळेकर हे संविधान समारंभाचे मुख्य आकर्षण होते. यावेळी भारत गणेशपुरे आणि निशा परुळेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत संविधानामुळेच देश बळकट असल्याचे मत व्यक्त केले. मैत्री परिवारने सांभाळली चोख व्यवस्था संविधान दिनाचा राज्यातील मुख्य शासकीय कार्यक्रम यशवंत स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता. शासकीय यंत्रणा कामाला लागली असली तरी कार्यक्रमाच्या नियोजनाची संपूर्ण व्यवस्था ही मैत्री परिवारावर सोपविण्यात आली होती. त्यांनी आपली संपूर्ण व्यवस्था चोखपणे पार पाडीत हा अभूतपूर्व कार्यक्रम यशस्वी केला. मैत्री परिवारचे सचिव प्रा. प्रमोद पेंडके, अध्यक्ष प्रा. संजय भेंडे यांच्यासह संजय नखाते, राजू वरभे, विजय जथे, शरद सूर्यवंशी, मिलिंद देशकर, सुहास खरे, प्रफुल्ल मनोहर, विजय शहकार, अशोक जैन, राम वाडी, अर्चना कोठेवार, मंजुषा पांढरीपांडे, रश्मी देशकर, राधा सहस्त्रभोजनी, मृणाल पाठक आणि अपर्णा मनोहर आदींसह मैत्री परिवारच्या अनेक सदस्यांनी परिश्रम घेतले.