शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात जेल टुरिझम २६ पासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य सरकारने महाराष्ट्रात जेल टुरिजम सुरू करण्याचा निर्णय घेतला असून २६ जानेवारीला येरवडा (पुणे) ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य सरकारने महाराष्ट्रात जेल टुरिजम सुरू करण्याचा निर्णय घेतला असून २६ जानेवारीला येरवडा (पुणे) कारागृहातून त्याची सुरुवात केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी पत्रकारांना दिली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. कारागृह पर्यटनाचा (जेल टुरिझम) हा भारतातील पहिलाच उपक्रम असल्याचीही माहिती त्यांनी दिली. स्वातंत्र्यपूर्व तसेच स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असलेल्या महाराष्ट्रातील अनेक कारागृहात संबंधित घडामोडींचे संदर्भ कारागृह प्रशासनाकडून जपून ठेवण्यात आले आहेत.

येरवडा, ठाणे, नाशिक, नागपूर कारागृह स्वातंत्र्यलढ्यादरम्यानच्या अनेक घटना, प्रसंगाचे साक्षीदार आहेत. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरूंसह अनेक थोर मंडळी या कारागृहात राहिली आहेत. ते ज्या ठिकाणी राहिले, त्या कोठड्यांचेही जतन करण्यात आले आहे. म. गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील ऐतिहासिक पुणे करारही याच कारागृहातील आंब्याच्या झाडाखाली झाला आहे. त्या झाडाचेही जतन करण्यात आले आहे. पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब, जनरल वैद्य यांचे मारेकरी जिंदा आणि सुखा तसेच चाफेकर बंधूंना येरवड्यातच फासावर टांगण्यात आले होते. अशा अनेक ऐतिहासिक घडामोडींचे साक्षीदार असलेल्या येरवडा कारागृहाची सर्वांना, खास करून विद्यार्थ्यांना तसेच संशोधकांना माहिती मिळावी या उद्देशाने जेल टुरिझमचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येरवडानंतर राज्यातील अन्य कारागृहांतही कारागृह पर्यटन सुरू केले जाणार असल्याचे गृहमंत्री म्हणाले.

माफक क्षुल्क घेणार

पर्यटक म्हणून ज्यांना कारागृह बघायचे आहे, त्या व्यक्ती, संस्थांना आधी अर्ज करावा लागेल. कारागृहात जाताना खाद्यपदार्थ, बॅगेज, मोबाइल, कॅमेरा, पाण्याची बाटली अथवा कुठलीच वस्तू आतमध्ये नेता येणार नाही. प्रशासनाकडून फोटो आणि व्हिडीओग्राफीची व्यवस्था करून देण्यात आली आहे. ते नंतर संबंधितांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासंबंधीचे प्रवेश शुल्क शालेय विद्यार्थ्यांसाठी ५, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी १०, तर अन्य पर्यटकांना केवळ ५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

----

अर्णबविरुद्ध कारवाईसाठी चाचपणी

पत्रकारांशी बोलताना गृहमंत्र्यांनी अर्णब गोस्वामीचा मुद्दा उपस्थित केला. बालाकोटमधील हल्ल्याची माहिती अर्णबला तीन दिवसांपूर्वीच मिळाली होती, असे बारप्रमुख दासगुप्तासोबतच्या चॅटिंगवरून स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या अनुषंगाने ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करता येईल का, त्यासंबंधाने कायदेतज्ज्ञांशी चर्चा सुरू असल्याचे गृहमंत्री देशमुख म्हणाले. नाईक प्रकरणात अर्णबविरुद्ध कारवाई झाली त्यावेळी भाजप नेत्यांनी त्याचा उघड बचाव केला होता. आता प्रकरण थेट देशाच्या सुरक्षेशीच संबंधित आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे, अशीही मागणी देशमुख यांनी केली.

----