शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आता मुलांनी लढावी शेतकरी बापाची लढाई

By admin | Updated: October 9, 2016 02:32 IST

ज्याची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे तो शेतकरी, अशी शेतकऱ्याच्या व्याख्येची शासन दफ्तरी नोंद आहे.

अमर हबीब : दोन दिवसीय व्याख्यानमालेचा समारोप
नागपूर : ज्याची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे तो शेतकरी, अशी शेतकऱ्याच्या व्याख्येची शासन दफ्तरी नोंद आहे. परंतु आज राजकीय नेत्यांपासून तर चित्रपट कलावंतांपर्यंत सर्वच शेतकरी झाले आहेत. पैसा ओतून फुलवलेल्या त्यांच्या मळ्यातील प्रयोगशीलतेच्या कथा सर्वत्र छापून येत आहेत आणि दुसरीकडे शेतकऱ्याची आत्महत्या आता बातमीचाच विषय राहिलेला नाही. ही विसंगती आजच्या व्यवस्थेने निर्माण केली आहे. ती बदलायची असेल तर शेतीपासून लांब शहरात राहणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलांनी आता या लढ्याचे नेतृत्व करायला पुढे यावे, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत व पत्रकार अमर हबीब यांनी केले. जनमुक्ती संघर्ष वाहिनी व महाराष्ट्र गांधी स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तुरबा भवनात आयोजित दोन दिवसीय व्याख्यानमालेचा आज शनिवारी त्यांच्या व्याख्यानाने समारोप झाला. यावेळी ते बोलत होते. ‘जनआंदोलनापुढील आव्हाने व शेतकरी आत्महत्यांचे वास्तव’ असा आजचा विषय होता. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी व त्यांच्यासोबत मंचावर महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव सुनील पाटील, जनमुक्ती संघर्ष वाहिनीचे संयोजक डॉ. प्रकाश तोवर उपस्थित होते. अमर हबीब पुढे म्हणाले, शेतकरी आत्महत्यांकडे शंकेच्या दृष्टीने बघितले जाते. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे, गावे संपन्न झाली आहेत. मग शेतकरी का आत्महत्या करतोय, असा प्रश्न विचारला जातोय. हा प्रश्नच चुकीचा आहे. गावातील संपन्नता शेतीच्या उत्पादनातून आलेली नाही. ज्या शेतकऱ्यांनी आपली मुले शहरात नोकरीसाठी पाठवली त्यांच्या कष्टातून चार पैसे गावातल्या माय-बापांना मिळत आहे. शेतीची दैनावस्था आहे तशीच कायम आहे. त्यात पुन्हा सिलिंगसारख्या कायद्यांनी श्ेतकऱ्यांचे जगणे हराम करून टाकले आहे. शेतकरी संघटित नाही त्यामुळे त्याचा आवाज तितक्या प्रभावीपणे सरकारच्या दरबारात पोहोचत नाही. तो पोहोचवायची ताकदही आता खंगलेल्या शेतकऱ्यांमध्ये फारशी उरलेली नाही.
या काळ्या आईचे ऋण फेडण्यासाठी शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे करण्यास सरकारला बाध्य करायचे असेल तर शेतीपासून लांब शहरात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांनी पुढे येणे गरजेचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आज ८ आॅक्टोबर हा लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा स्मृतिदिवस असल्याने त्यांनी जेपींच्या जातीअंताच्या लढ्यातील आठवणीही श्रोत्यांना सांगितल्या. या कार्यक्रमाचे संचालन रेखा देवघरे यांनी केले.(प्रतिनिधी)