शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राने राबवावा दारुबंदीचा ‘बिहार पॅटर्न’

By admin | Updated: October 9, 2016 02:21 IST

राज्यासह देशातील गुन्हेगारी घटनांना दारू हे मुख्य कारण असते. तरीदेखील महसुलाचा आकडा लक्षात घेऊन राज्य शासनातर्फे त्यावर बंदी लावण्यात येत नाही.

मेधा पाटकर : नशामुक्त भारत आंदोलन राष्ट्रीय यात्रा नागपुरात
नागपूर : राज्यासह देशातील गुन्हेगारी घटनांना दारू हे मुख्य कारण असते. तरीदेखील महसुलाचा आकडा लक्षात घेऊन राज्य शासनातर्फे त्यावर बंदी लावण्यात येत नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यासंदर्भात पावले उचलली आहेत व तेथे दारुऐवजी दूधविक्री सुरू झाली आहे. राज्यानेदेखील दारुबंदीचा ‘बिहार पॅटर्न’ राबविला पाहिजे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व ‘नशामुक्त भारत आंदोलन’च्या राष्ट्रीय संयोजक मेधा पाटकर यांनी व्यक्त केले. देश नशामुक्त झाला पाहिजे यासाठी नशामुक्त भारत आंदोलनाअंतर्गत राष्ट्रीय यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा शनिवारी नागपुरात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
अमरावती मार्गावरील विनोबा भावे विचार केंद्रात दारुबंदी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेनंतर पत्रपरिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली. दारूपासून मिळणारा महसूल वाढावा यासाठी शासनातील मंत्री, अधिकारी प्रयत्नरत असतात. अधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात येतात. मात्र यामुळे समाजाचे नुकसान होते. दारुबंदीच्या मुद्यावर शासन संवेदनशील नाही, असा आरोप त्यांनी केला. राज्यात बिहारसारखा दारुबंदीवर सशक्त कायदा आणला पाहिजे. यासाठी समाजात जनजागृती करण्याचीदेखील गरज आहे, असे त्या म्हणाल्या. रविवारी ही यात्रा यवतमाळ व तेथून पुसद येथे पोहोचणार आहे़ पत्रपरिषदेला लीलाताई चितळे, मुलताईचे माजी आ़ डॉ़ सुनीलम्, विलास भोंगाडे, भुपेंद्र रावत, राघवेंद्र बालीया, आनंदी अम्मा, इनामूल, शिवाजी मुथ्थूकुमार, बलवंतसिंह यादव, माया चवरे, रजनीकांत, दीपक चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते़ (प्रतिनिधी)

पाकविरोधातील ‘सर्जिकल स्ट्राईक’ समर्थनीय नाहीच
उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानवर ‘सर्जिकल स्ट्राईक’चे पाऊल उचलण्यात आले. परंतु याचे समर्थन करता येणार नाही. हिंसेचे उत्तर हिंसेने देणे योग्य नाही. भारत-पाकिस्तानमधील समस्यांचे उत्तर युद्धातून मिळणार नाही, या शब्दांत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केंद्र सरकारच्या ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या निर्णयावर टीका केली. नशामुक्त भारत आंदोलनांतर्गत काढण्यात आलेली राष्ट्रीय यात्रा शनिवारी नागपुरात आली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले.गांधी विचारांवर चालणारा आपला देश आहे. शेजारी राष्ट्रांसोबत सौहार्दपूर्ण संबंध असले पाहिजे. चर्चेतूनच सौहार्द निर्माण होते. आत्मसुरक्षेचा सर्वांना अधिकार आहे. परंतु युद्ध हा अंतिम पर्याय असू शकत नाही. देशात ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या माध्यमातून युद्धज्वर पसरविणे अयोग्य आहे. जी कृती पाकिस्तानने केली, तीच भारताने केली तर त्यांच्यात व आपल्यात काहीच फरक राहणार नाही, असे प्रतिपादन पाटकर यांनी केले.

कुठे गेले ‘गुजरात मॉडेल’?
भाजपाकडून ‘गुजरात मॉडेल’चे खूप कौतुक करण्यात येते. भाजपाशासित राज्यांकडून याचे अनुसरण करण्याचा दावा करण्यात येतो. परंतु या ‘मॉडेल’मध्ये दारुबंदीचा समावेश आहे. याचे अनुकरण करण्यात का येत नाही, असा प्रश्न मेधा पाटकर यांनी उपस्थित केला.