शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

भारत-बांगलादेश क्रिकेट सामना दरम्यान कर्तव्यावरील सहायक फौजदाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 10:56 AM

भारत आणि बांगलादेशदरम्यान होणाऱ्या क्रिकेट सामन्याच्या बंदोबस्तासाठी जामठा मैदान परिसरात तैनात असलेले सहायक फौजदार (एएसआय) मदार शेख यांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देहृदयविकाराचा धक्का जामठा परिसरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारत आणि बांगलादेशदरम्यान होणाऱ्या क्रिकेट सामन्याच्या बंदोबस्तासाठी जामठा मैदान परिसरात तैनात असलेले सहायक फौजदार (एएसआय) मदार शेख यांचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे पोलीस दलात शोककळा पसरली आहे.मदार शेख पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. रविवारी भारत-बांगलादेश दरम्यान जामठा येथे एकदिवसीय क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला होता. त्याच्या बंदोबस्तासाठी सकाळपासूनच पोलीस तैनात करण्यात आले होते. एएसआय मदार शेख हेदेखील सहकाऱ्यांसह जामठा येथे बंदोबस्तासाठी गेले होते. दुपारी १२ च्या सुमारास वरिष्ठ पोलीस अधिकारी कुणाची कुठे तैनाती द्यायची, याबाबत चर्चा करीत होते. त्यावेळी मदार शेख स्टेडियमच्या जवळ लावलेल्या पेंडालमध्ये कर्तव्यावर होते. अचानक चक्कर येऊन ते खाली पडले. त्यामुळे सहकारी पोलिसांनी त्यांना पाणी देऊन विचारणा केली.छाती दुखत असल्याचे सांगितल्यामुळे त्यांना जामठा येथील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मदार शेख यांच्या मृत्यूची वार्ता कळताच पोलीस दलात शोककळा निर्माण झाली.एक उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून मदार शेख यांची शहरातील क्रीडा क्षेत्रात ओळख होती. ते न्यू ताज क्रीडा मंडळाचे खेळाडू अन् मार्गदर्शक म्हणूूनही ओळखले जायचे. हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

सलग बंदोबस्त, सारखा ताण !गेल्या सहा महिन्यांपासून शहर पोलीस सलग बंदोबस्तावर आहे. आधी सणोत्सव, नंतर निवडणुका, त्यानंतर निकाल अन् आता अयोध्या निकाल, तो आटोपत नाही तर क्रिकेट सामन्याचा बंदोबस्त. सारख्यासारख्या बंदोबस्तामुळे पोलिसांवरील ताण कमालीचा वाढला आहे. कर्तव्यामुळे आधीच आरोग्याकडे दुर्लक्ष होत असताना हक्काच्या सुट्यांवरही गदा आल्याने पोलीस नाकतोंड दाबून बुक्क्याचा मार खावा, अशा अवस्थेत कर्तव्य बजावत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :PoliceपोलिसDeathमृत्यू