शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

हवामान बदलाचा होतोय ऋतूंच्या कालावधीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 4:08 AM

मेहा शर्मा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरातील हवामानाच्या वेळापत्रकात मागील काही वर्षांपासून चिंताजनक बदल घडत आहेत. तज्ज्ञांच्या मते, ...

मेहा शर्मा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपुरातील हवामानाच्या वेळापत्रकात मागील काही वर्षांपासून चिंताजनक बदल घडत आहेत. तज्ज्ञांच्या मते, ग्लोबल वॉर्मिंगमुळेच ऋतुमानात हे बदल घडत आहेत. नोव्हेंबर ते जानेवारी हे सर्वाधिक थंडीचे महिने मानले जात असले तरी या वर्षात दोन दिवसांचा अपवाद वगळता या संपूर्ण कालावधीत थंडीचा अनुभव आला नाही.

विदर्भ उष्णतेसाठी प्रसिद्ध आहे. मात्र २०१९ मध्ये विदर्भातील उन्हाळा म्हणावा तसा तापला नाही. मुख्यतः मागील वर्षात बहुतेक काळ पाऊसच अनुभवला. यासंदर्भात ‘लोकमत’शी संवाद साधताना एनईईआरआयचे संचालक राकेश कुमार म्हणाले, एका वर्षाच्या बदलाला हवामान बदलाचे श्रेय दिले जाऊ शकत नाही. मात्र ऋतुमानामध्ये दिसणारा बदल वैश्विक तापमानाकडे दिशानिर्देश करणारा आहे. हवामान अनिश्चित बनले असले तरी हिवाळा पूर्णपणे नाहीसा झाला असे म्हणता येणार नाही. या बदलामुळे वनस्पती, पिके तसेच रोगप्रणालीत बदल दिसेल, असेही ते म्हणाले.

नागपूर हवामान विभागाच्या सूत्रांच्या मते, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तापमान खाली येऊन १० ते १२ अंशांच्या आसपास पोहोचले. उत्तरेकडून वारे येताना मध्य भारताला थंडीचा अनुभव येतो. मात्र त्याच वेळी बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा आणि चक्रीवादळ अभिसरण तयार झाल्याने आणि अरबी समुद्रामध्ये उत्तर-पश्चिम दिशेने येणारे वारे दक्षिण पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे रोखले गेले. यामुळे यावर्षी हिवाळा अनुभवला नाही. तज्ज्ञांच्या मते, यावर्षी पुन्हा हिवाळा उशिरा होण्याची शक्यता आहे.

जागतिक तापमानवाढ २ अंशाच्या पुढे वाढल्यास हिंदुकुश हिमालयावरील हिमनग वितळतील. त्यामुळे संबंधित देशांना नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागण्याची शक्यता राहील.

...

कोट

हिमालयातील बर्फ वितळत असल्याने भारत आणि चीनमधील प्रमुख नद्यांमध्ये अखेरीस पाणी कमी होईल. उष्ण पाण्यामुळे चक्रीवादळ आणि उष्णकटिबंधीय वादळे वेगवान वाऱ्यासह अधिक वेगवान बनतात. वादळे उष्ण समुद्राच्या पाण्यापासून ऊर्जा आणतात. त्यामुळे मध्यम कमकुवत वादळापासून तीव्र आणि विध्वंसक वादळ होऊ शकते. भविष्यात भारतालाही याचा अनुभव येण्याची शक्यता आहे.

- पेटेरी टॅलस, महासचिव, जागतिक हवामान संस्था

...

...