शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

अबब... एका महिन्यात सापडले ५ लाख बेशिस्त प्रवासी, कसे करावे यांचे; मध्य रेल्वेचा प्रश्न

By नरेश डोंगरे | Updated: May 14, 2026 22:46 IST

कुणाकडे तिकिटच नाही; कुणी जनरलचे तिकिट घेऊन चढले एसी कोचमध्ये

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : अनेकदा ताकिद देऊन आणि वारंवार कारवाई करूनही 'ते' सुधरायला तयार नाहीत. त्यामुळे 'कसे करावे यांचे' असा प्रश्न रेल्वे प्रशासनासमोर पडला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्यालयासह सहा झोनमध्ये अवघ्या ३० दिवसांत अर्थात गेल्या एप्रिल महिन्यात तब्बल ४ लाख, ९६ हजार बेशिस्त प्रवासी पकडले गेले आहेत. त्याचमुळे रेल्वे प्रशासनाला हा प्रश्न पडला आहे.

अलिकडे रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. सर्वच स्थानके, सर्वच गाड्या प्रवाशांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. अनेक गाड्यांमध्ये पाय ठेवायला जागा नाही. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने काही स्पेशल ट्रेनही वाढविल्या आहेत. मात्र, गर्दी नियंत्रणात यायचे नाव घेत नाही. गर्दीचा लाभ उठवत फुकटे प्रवासी बिनधास्त प्रवास करीत असल्याने गेल्या एप्रिल महिन्यात मध्य रेल्वेने मुख्यालयासह राज्यातील सहाही झोनमध्ये आक्रमक तिकिट तपासणी मोहिम राबविली. त्यात तब्बल ४ लाख, ९६ हजार प्रवासी पकडले गेले. सर्वाधिक प्रवासी मुंबई विभागात तर सर्वाधिक कमी प्रवासी सोलापूर आणि मुंबई मुख्यालयात हाती लागले. त्यांच्याकडून मध्य रेल्वेने ४० कोटी, ८५ लाखांचा दंड वसूल केला.

तिकीट/ वैध तिकीटाशिवाय प्रवास करताना पकडलेल्या प्रवाशांचा विभागनिहाय तपशील आणि त्यांच्याकडून वसूल केलेली दंडाची रक्कम खालीलप्रमाणे आहे.

मुंबई विभाग २.२७ लाख प्रवासी; १६.१३ कोटी दंड वसूल

भुसावळ विभाग १.०९ लाख प्रवासी; २.२३ कोटी दंड

नागपूर विभाग ५८ हजार प्रवासी; ३.९२ कोटी दंड

पुणे विभाग ५२ हजार प्रवासी; ४.५४ कोटी दंड

मुख्यालय २६ हजार प्रवासी; २.५८ कोटी दंड

आणि

सोलापूर विभाग २५ हजार प्रवाशांकडून १.४५ कोटी दंड वसूल

गेल्या वर्षीपेक्षा ६३ टक्के जास्त

गेल्या वर्षी अर्थात एप्रिल २०२५ मध्ये अशाच प्रकारे ४ लाख, ४ हजार प्रवाशांना पकडण्यात आले होते. त्यांच्याकडून दंडापोटी २५ कोटी, ३ लाख रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली होती. या तुलनेत यावर्षी वसूल करण्यात आलेली दंडाची रक्कम ६३ टक्के जास्त आहे.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Central Railway: Lakhs of Unruly Passengers Caught, Fine Collected!

Web Summary : Central Railway caught nearly five lakh ticketless travelers in April. Fines collected totaled over ₹40 crore. Mumbai division had the highest number of offenders. Compared to last year, fines increased by 63%.
टॅग्स :nagpurनागपूरcentral railwayमध्य रेल्वे