शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, अचौर्य आणि अनेकांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 06:00 IST

माणसाचे जीवन बदलण्याची शक्ती असलेली तत्वे म्हणजे भगवान महावीरांनी जगाला दिलेली अमोल देणगी आहे!

ठळक मुद्देमहावीर भगवान यांच्या तत्त्वांचा अंगीकार करणारा वर्तनाने सज्जन व भावनेने सहृदयी होतो. या गुणांकडे जाण्याचा मार्ग महावीर आपल्या उपदेशातून करतात.

- सेवादास दलिचंद ओसवाल

(संघपती, जळगाव)

भगवान महावीर यांचा कार्यकाळ २५०० वर्षांपूर्वीचा मानला जातो. कुंललपूरच्या (बिहार) राजघराण्यात जन्मलेल्या महावीर यांनी वयाच्या ३० व्या वर्षी सन्यस्थ व्रत स्वीकारले. आत्मकल्याण करण्यासाठी जैन दीक्षा घेऊन ते एक तपस्वी बनले. त्यानंतर आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीसाठी त्यांनी साडेबारा वर्षं तपश्चर्या केली. सुख-सुविधा त्यागून आत्मा आणि शरीर यातला संबंध ते शोधू लागले.

शरीर आणि आत्मा वेगवेगळे आहेत. आत्मा अजर-अमर-अविनाशी आहे. कर्म करण्यासाठी शरीर महत्त्वाचे आहे. पण शरीर नाशवंत असून ते फक्त माध्यम आहे, असा मुक्तीचा साधा-सोपा उपदेश महावीर यांनी समस्त मानव समाजाला केला.

भगवान महावीर यांना त्रिलोकांचे कैवल्य ज्ञान प्राप्त झाले. चांगला समाज निर्माण करण्यासाठी, समाजकल्याणासाठी महावीर यांनी ज्ञान प्रसारणाचे अविरत कार्य केले. समाजावर आणि माणसांवर प्रेम करा असा संदेश देण्यासाठी महावीर देशभर फिरले. अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, अचौर्य आणि अनेकांत या सहा तत्त्वांचा प्रसार त्यांनी केला. यातील अहिंसा हे तत्त्व संपूर्ण विश्वाने स्वीकारले. स्व-स्वार्थासाठी दुसऱ्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ न देणे म्हणजे अहिंसा होय. आपल्या शरीराला किंवा मनाला जशा वेदना होतात त्या इतरांनाही होत असतील याची जाणीव होणे म्हणजेच अहिंसेचा स्वीकार करणे.

प्रत्येक व्यक्तीने कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये हाच अहिंसा तत्त्वाचा भावार्थ आहे. सध्या होत असलेला पर्यावरणाचा ऱ्हास, नातेसंबंधामधील कटुता, अति लोभ हे प्रसंग अहिंसा तत्त्वाचा अंगीकार केल्यास नक्की टाळता येऊ शकतात. या तत्त्वाला अनुसरून प्रत्येक व्यक्तीने त्याच्याजवळ जे आहे ते समाजासाठी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गरीब दुर्बल व्यक्तींना दोष न देता त्यांच्या उत्थानासाठी सदैव प्रयत्न केले पाहिजेत. काहीही झाले तरी सत्य हे सत्य असते, ते थोडे कटू असते, मात्र ते गोड होऊ शकते हेच अहिंसा तत्त्वाचे सार मानायला हवे.

सत्याची कधीही अवहेलना करू नये. कोणाचीही, कोणत्याही प्रकारे फसवणूक करणे म्हणजे चोरी करणे. असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला त्याचे फळ इतर कोणत्याही रूपाने मिळत असते. सभोवतालचे वातावरण कसेही असले तरी मनावर नियंत्रण पाहिजे.

अपरिग्रह म्हणजे आपल्या मेहनतीने आणि प्रारब्धाने जे मिळाले त्याचा अहंकार न बाळगता आपल्या सोबत असलेल्यांना मदतीचा हात देऊन त्यांनाही प्रगतीसाठी संधी देणे. अपरिग्रहामध्ये आपल्याला मिळालेल्या संपत्तीमधून कायम समाजासाठी देण्याची भावना अभिप्रेत आहे. थोडक्यात अनीतीने पैसा न कमाविणे म्हणजे अपरिग्रह होय.

प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक बाबतीत आपले मत हे अंतिम सत्य आहे असे न मानता इतर व्यक्तींचेही मत विचारात घेऊन त्यावर उपाय काढणे, विषय सोडविणे यालाच अनेकांत म्हणतात. विचारांमध्ये लवचीकता असली पाहिजे तसेच प्रत्येक व्यक्तीचे मत महत्त्वाचे असल्याने तेही विचारात घेणे अनेकांत या तत्त्वामध्ये अभिप्रेत आहे.

- महावीर भगवान यांच्या तत्त्वांचा अंगीकार करणारा वर्तनाने सज्जन व भावनेने सहृदयी होतो. या गुणांकडे जाण्याचा मार्ग महावीर आपल्या उपदेशातून करतात.