शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, अचौर्य आणि अनेकांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 6:00 AM

माणसाचे जीवन बदलण्याची शक्ती असलेली तत्वे म्हणजे भगवान महावीरांनी जगाला दिलेली अमोल देणगी आहे!

ठळक मुद्देमहावीर भगवान यांच्या तत्त्वांचा अंगीकार करणारा वर्तनाने सज्जन व भावनेने सहृदयी होतो. या गुणांकडे जाण्याचा मार्ग महावीर आपल्या उपदेशातून करतात.

- सेवादास दलिचंद ओसवाल

(संघपती, जळगाव)

भगवान महावीर यांचा कार्यकाळ २५०० वर्षांपूर्वीचा मानला जातो. कुंललपूरच्या (बिहार) राजघराण्यात जन्मलेल्या महावीर यांनी वयाच्या ३० व्या वर्षी सन्यस्थ व्रत स्वीकारले. आत्मकल्याण करण्यासाठी जैन दीक्षा घेऊन ते एक तपस्वी बनले. त्यानंतर आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीसाठी त्यांनी साडेबारा वर्षं तपश्चर्या केली. सुख-सुविधा त्यागून आत्मा आणि शरीर यातला संबंध ते शोधू लागले.

शरीर आणि आत्मा वेगवेगळे आहेत. आत्मा अजर-अमर-अविनाशी आहे. कर्म करण्यासाठी शरीर महत्त्वाचे आहे. पण शरीर नाशवंत असून ते फक्त माध्यम आहे, असा मुक्तीचा साधा-सोपा उपदेश महावीर यांनी समस्त मानव समाजाला केला.

भगवान महावीर यांना त्रिलोकांचे कैवल्य ज्ञान प्राप्त झाले. चांगला समाज निर्माण करण्यासाठी, समाजकल्याणासाठी महावीर यांनी ज्ञान प्रसारणाचे अविरत कार्य केले. समाजावर आणि माणसांवर प्रेम करा असा संदेश देण्यासाठी महावीर देशभर फिरले. अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, अचौर्य आणि अनेकांत या सहा तत्त्वांचा प्रसार त्यांनी केला. यातील अहिंसा हे तत्त्व संपूर्ण विश्वाने स्वीकारले. स्व-स्वार्थासाठी दुसऱ्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ न देणे म्हणजे अहिंसा होय. आपल्या शरीराला किंवा मनाला जशा वेदना होतात त्या इतरांनाही होत असतील याची जाणीव होणे म्हणजेच अहिंसेचा स्वीकार करणे.

प्रत्येक व्यक्तीने कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये हाच अहिंसा तत्त्वाचा भावार्थ आहे. सध्या होत असलेला पर्यावरणाचा ऱ्हास, नातेसंबंधामधील कटुता, अति लोभ हे प्रसंग अहिंसा तत्त्वाचा अंगीकार केल्यास नक्की टाळता येऊ शकतात. या तत्त्वाला अनुसरून प्रत्येक व्यक्तीने त्याच्याजवळ जे आहे ते समाजासाठी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गरीब दुर्बल व्यक्तींना दोष न देता त्यांच्या उत्थानासाठी सदैव प्रयत्न केले पाहिजेत. काहीही झाले तरी सत्य हे सत्य असते, ते थोडे कटू असते, मात्र ते गोड होऊ शकते हेच अहिंसा तत्त्वाचे सार मानायला हवे.

सत्याची कधीही अवहेलना करू नये. कोणाचीही, कोणत्याही प्रकारे फसवणूक करणे म्हणजे चोरी करणे. असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला त्याचे फळ इतर कोणत्याही रूपाने मिळत असते. सभोवतालचे वातावरण कसेही असले तरी मनावर नियंत्रण पाहिजे.

अपरिग्रह म्हणजे आपल्या मेहनतीने आणि प्रारब्धाने जे मिळाले त्याचा अहंकार न बाळगता आपल्या सोबत असलेल्यांना मदतीचा हात देऊन त्यांनाही प्रगतीसाठी संधी देणे. अपरिग्रहामध्ये आपल्याला मिळालेल्या संपत्तीमधून कायम समाजासाठी देण्याची भावना अभिप्रेत आहे. थोडक्यात अनीतीने पैसा न कमाविणे म्हणजे अपरिग्रह होय.

प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक बाबतीत आपले मत हे अंतिम सत्य आहे असे न मानता इतर व्यक्तींचेही मत विचारात घेऊन त्यावर उपाय काढणे, विषय सोडविणे यालाच अनेकांत म्हणतात. विचारांमध्ये लवचीकता असली पाहिजे तसेच प्रत्येक व्यक्तीचे मत महत्त्वाचे असल्याने तेही विचारात घेणे अनेकांत या तत्त्वामध्ये अभिप्रेत आहे.

- महावीर भगवान यांच्या तत्त्वांचा अंगीकार करणारा वर्तनाने सज्जन व भावनेने सहृदयी होतो. या गुणांकडे जाण्याचा मार्ग महावीर आपल्या उपदेशातून करतात.