शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
3
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
4
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
5
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
6
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
7
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
8
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
9
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
10
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
11
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
12
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
13
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
14
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
15
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
16
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
17
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
18
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
19
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
20
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश

मनसेचा नमो निर्माण पक्ष का झाला? संजय राऊतांचा राज ठाकरेंना खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 11:06 AM

Sanjay Raut : भाजपाने राज ठाकरे यांची अशी कोणती फाईल उघडली की, त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण हा पक्ष नमो निर्माण पक्ष झाला? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

मुंबई : देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे, असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी दादरमधील शिवाजी पार्क येथे आयोजित गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. भाजपाने राज ठाकरे यांची अशी कोणती फाईल उघडली की, त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण हा पक्ष नमो निर्माण पक्ष झाला? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

गेल्या काही काळापासून महाराष्ट्राची अक्षरश: लूट सुरू आहे, खोक्याचं अत्यंत घाणेरडं राजकारण सुरू आहे. त्याचे सूत्रधार नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे आहेत. राज्यातून उद्योग पळवला जातोय, मुंबई तोडण्याचा, मुंबई विकलांग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा वेळी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला जो पक्ष आहे, तोच महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा देत असेल तर लोकांच्या मनात शंका उत्पन होतात. त्याचीच उत्तर त्यांना (राज ठाकरे)  द्यावी लागतील. असं काय घडलं की तुम्ही राज्याच्या शत्रूंना पाठिंबा देत आहात, असा प्रश्न लोकं त्यांना विचारतील. तुमचा जो 'नवनिर्माण पक्ष' आहे, त्याचा 'नमो निर्माण पक्ष' का झाला? त्याची का गरज पडली? हे राज ठाकरे यांनी सांगितले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

याचबरोबर, आम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, स्वाभिमानासाठी लढत आहोत. समोर नरेंद्र मोदी असोत की अमित शाह,आम्ही शरणगती पत्करणार नाही. आम्ही कधीही स्वार्थासाठी भाजपासोबत राहिलो नाही. हिंदुत्ववादी मतांचं विभाजन होऊ नये म्हणून बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, प्रमोद महाजन या सगळ्यांनी त्या काळात ही युती केली होती. ती २५ वर्ष चालली. पण भाजपाने जेव्हा त्यांचे खरे दात दाखवायला सुरूवात केली, तेव्हा आम्ही तो जबडा फाडून बाहेर आलो आणि आमची स्वतंत्र भूमिका घेतली, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

राजकारणातून ओवाळून टाकलेले नेते भाजपाने आपल्याकडे घेतले आहे. त्यातील हे एक हे महाशय (राज ठाकरे) आहेत का नमो निर्माण वाले? पण राज्यातले सगळे ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी, व्यभिचारी, गुंड यांना आपल्या पक्षात वॉशिंगमशीन मध्ये घेऊन साफ करण हा व्यभिचार नाही का? त्याच व्यासपीठावर पाय ठेवला असेल तर राज ठाकरेंना लोकांना उत्तर द्याव लागेल, असे संजय राऊत म्हणाले. तसेच, अजित पवार ,हसन मुश्रीफ अशी अनेक नावे आहेत, ज्यांनी बिनशर्त भाजपासोबत जायचं मान्य केले. ते का गेले कोणाच्या दबावामुळे गेले हे सर्वांना माहीत आहे. मला असं वाटत नाही त्यांचं (राज ठाकरे) असं झालं असेल. पण शरणागती त्यांनी यासाठी पत्करली की त्यांच्या अनेक फाइली उघडल्या गेल्या, धमक्या दिल्या. त्यामुळे असं वाटतं व्यभिचार हा भाजपाचा जगजाहीर आहे, असे संजय राऊत म्हणाले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेSanjay Rautसंजय राऊतMumbaiमुंबईlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४MNSमनसेMNS Gudi Padwa Rallyमनसे गुढीपाडवा मेळावा