शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 09:56 IST

Uddhav Thackeray News: शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, तर कर्जमुक्ती हवी आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Uddhav Thackeray News: राज्य सरकारने शेतकऱ्यांना पीक विम्याचे २, ३ रुपये आणि ६ रुपये देऊन थट्टा केली आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मिळायला पाहिजे, सरकारचे पॅकेज आम्हाला मान्य नाही. मात्र, जे जाहीर केले ते तातडीने द्या, असा हल्लाबोल उद्धवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केला. मराठवाड्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी ठाकरे हे ४ दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खोचक टोला लगावला.

मुख्यमंत्री म्हणाले की, या निमित्ताने का होईना पण उद्धव ठाकरे घराबाहेर पडले. आता त्यांना उद्या उत्तर देईन. अजून काय म्हणाले की, उद्धव ठाकरे फक्त टोमणे मारतात, विकासावर बोललेले भाषण दाखवा आणि हजार रुपये मिळवा. मग मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही तुमच्या हेलिकॉप्टरने इथेच या आणि विकासाचे बोला, होऊन जाऊ दे. बंधारे फुटत गेले, चला बोला विकासाचे. मराठवाड्यात पाणी नाही, आले तर ते थांबतच नाही अशी स्थिती आहे. काय विकासाचे बोलू मी? कुणासमोर बोलू? जो अन्नदाता आपल्याकडे आशेने पाहतो आहे त्याला काय सांगू उद्या पाच पदरी उड्डाण पूल उभारेन. तुम्ही म्हणाल घाला खड्ड्यात तो उड्डाण पूल. आत्ता काय करू ते सांग. काय विकासाचे बोलू? या शब्दांत उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला. 

अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद

यांच्या उद्योगपती मित्रांची कर्जे माफ होत आहेत, ते परदेशात पळत आहेत. तुमच्यापैकी एक जण तरी परदेशात पळू शकतो का? कारण माझ्या शेतकऱ्यांची ती वृत्तीच नाही. घर सोडून फिरणारे हे मुख्यमंत्री आहे. महाराष्ट्र संकटात सापडला आहे आणि मुख्यमंत्री बिहारला गेले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. तसेच अजित पवार हे कायम उप असतात. त्यांना अखंड उप भव हा आशीर्वाद दिला आहे, असा टोला ठाकरेंनी लगावला.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी बीड जिल्ह्यातील पाली येथेही शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी कर्जमुक्तीच्या मुद्द्यावरून महायुती सरकारला थेट आव्हान दिले. त्यांनी सरकारला 'दगाबाज' म्हणत, निवडणुकीत याच 'दग्याने' प्रत्युत्तर द्या, असा हल्लाबोल सरकारवर चढवला. शेतकरी गुन्हेगार नाही, तो अन्नदाता आहे, त्यामुळे त्याला 'माफी' नको, तर 'कर्जमुक्ती' हवी आहे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. उद्धव ठाकरे यांनी धाराशिव जिल्ह्यातील परंडा व भूम तालुक्यांतील शेतकऱ्यांशीही संवाद साधला.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Uddhav Thackeray Criticizes Ajit Pawar, Attacks State Government on Farmer Issues.

Web Summary : Uddhav Thackeray slammed the state government for inadequate farmer compensation, demanding ₹50,000 per hectare. He mocked Deputy CM Ajit Pawar, wishing him 'eternal deputy status'. Thackeray also criticized the CM for neglecting Maharashtra's crisis while visiting Bihar.
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाAjit Pawarअजित पवारFarmerशेतकरीfarmingशेती