शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चराईबंदीमुळे मेंढपाळ अडचणीत

By admin | Updated: July 18, 2014 00:58 IST

मेंढीपालन हा धनगर समाजाचा पिढीजात व्यवसाय आहे. त्यांचा उदरनिर्वाहच या व्यवसायावर आहे. मात्र वनविभागाने त्यांना चाराबंदी केल्याने कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली आहे.

मेंढपाळांचा सवाल : ११ लाख मेंढ्यांच्या चराईचा प्रश्न, मोफत पासेसला वनविभागाचा ब्रेक
रूपेश उत्तरवार - यवतमाळ
मेंढीपालन हा धनगर समाजाचा पिढीजात व्यवसाय आहे. त्यांचा उदरनिर्वाहच या व्यवसायावर आहे. मात्र वनविभागाने त्यांना चाराबंदी केल्याने कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे आता जगायचे कसे असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. आम्हाला न्याय द्या अन्यथा आमच्या हातात बंदुका देवून नक्षलवादी बनण्याची परवानगी द्या अशी लेखी मागणी मेंढपाळ अन्याय निवारण समितीने वनविभागाकडे केली आहे.
विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये १० हजार मेंढपाळ आहेत. त्यांच्याकडे ११ लाख मेंढ्या आहेत. कोरड्या दुष्काळाने या मेंढपाळांपुढे चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मेंढ्या चराईसाठी वनविभागाने बंदी घातली आहे. मेंढी चराईसाठी आरक्षित वनजमीन वन्यप्राण्यासाठी आरक्षित करण्यात आली आहे. मेंढ्यांना चराई करण्यासाठी क्षेत्रच शिल्लक राहीले नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात मेंढ्या चारायच्या कुठे? असा गंभीर प्रश्न मेंढपाळांपुढे निर्माण झाला आहे. संपूर्ण राज्यातच मेंढी चराईची भीषण समस्या निर्माण झाली आहे.
राज्यात ४८ वन विभाग आहेत. पैकी २७ विभागात मेंढी चराईला बंदी घालण्यात आली आहे. २१ पैकी काही जिल्ह्यात अंशत: परवानगी देण्यात आली आहे. या ठिकाणी वनविभाग सप्टेंबर ते मे पर्यंत मेंढी चराईच्या पासेस देतात. विदर्भात वनविभागाने चराईसाठी मोेजके क्षेत्र आरक्षित केले आहे. त्यावर एक हजार मेंढ्यांना चारा पास मिळण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात तीन लाख मेंढ्यांना चाऱ्यास मुकावे लागणार आहे.
पावसाळ्यात शेतजमिनी रिकाम्या नसतात. अशा स्थितीत मेंढ्यांना वाचवायचे कसे ? असा गंभीर पेच त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. परंपरागत मेंढीव्यवसाय भुईसपाट होण्याचा धोका आहे. यामुळे त्यांचे उपजिविकेचे साधनच हिरावल्या जाणार आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर मेंढपाळ आता आक्रमक झाले आहेत. हातात बंदूका देण्यासाठी वनविभागाला परवानगी मागितली आहे. यामुळे वनविभाग हादरला असून मेंढपाळ आणि वनविभागात ठिणगी पडण्याचे संकेत आहेत. याप्रकरणी वनविभागाने मात्र आपले हात वर केले आहेत.
मेंढपाळांची मुले शाळाबाह्य
रानावनात राहणाऱ्या मेंढपाळांची मुले शाळेत जात नाही. त्यामुळे ही मुले शाळाबाह्य झाली आहेत. त्यांच्यासाठी वस्तीशाळा सुरू करण्याकरिता शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.