शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 22:58 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलक नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत राज्य सरकारने चर्चा केली. यावेळी सरकारने बच्चू कडू आणि इतर नेत्यांना काय सांगितलं, याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. 

"आम्ही आज असा निर्णय केला आहे की, या समितीने काम पूर्ण करावे आणि एक अहवाल द्यावा. या अहवालावर कर्जमाफीच्या संदर्भातील निर्णय आम्हाला करायचा आहे, तो तीन महिन्यात म्हणजे ३० जून २०२६ पूर्वी करण्याचा निर्णय घेतला आहे. सगळे टप्पे आम्ही ठरवले आहेत. सगळ्या नेत्यांशी आमची चर्चा झाली. अतिशय सकारात्मक चर्चा झाली. त्या चर्चेत त्यांनीही मान्यता दिली आहे", असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "आम्ही आमच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यासंदर्भात आम्ही एक समिती तयार करून कर्जमाफी कशी करायची. दीर्घ कालीन उपाय योजना काय करायच्या? अशा सगळ्या गोष्टींचा निर्णय केला होता. कारण कर्जमाफी हा एक भाग आहे. पण, शेतकरी वारंवार कर्जाच्या विळख्यात अडकतो. त्यांना आपण बाहेर कसे काढू शकतो, अशा प्रकारचा सगळा विचार व्हावा, अशी अपेक्षा होती. त्यादृष्टीने आम्ही मित्राचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली आहे", अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

उच्चाधिकार समिती कोणत्या मुद्द्याचा विचार करणार? 

"ही समिती कर्जमाफी कशी करता येईल, त्याचे निकष काय असतील, भविष्यात शेतकऱ्यांना आपल्याला कर्जाच्या विळख्यातून बाहेर कसे ठेवता येईल, किंवा थकीत कर्जात तो जाणार नाही, यासाठी काय उपाय योजना करता येतील या सगळ्या बाबींवर निर्णय करेल", असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 

"आम्ही पहिल्या दिवसापासून कर्जमाफीच्या बाजूनेच आहोत. आम्ही दिलेले आश्वासन पाळू हेच सांगितलं आहे. पण, आता लगेच शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे देणे गरजेचे आहे. कर्जाची वसुली जून महिन्यात होणार आहे. आता जर आपण शेतकऱ्याच्या खात्यात पैसे दिले नाही, तर शेतकरी रब्बीचा पेरा देखील करू शकत नाही. म्हणून तत्काळ पैसे देण्यासाठी सगळी तरतूद आम्ही केली आहे", असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. 

११ हजार कोटी रुपयांना मंत्रिमंडळाची मंजुरी

"जवळपास साडेआठ हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यातील सहा हजार कोटी प्रत्यक्ष खात्यात जमा झाले आहे. उरलेले पैसे जमा होत आहे. अजून ११ हजार कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे. तेही दोन ते तीन दिवसात दिले जाणार आहेत. अजून दीड हजार कोटींची तरतूद आम्ही केली आहे. आम्ही शिष्टमंडळाला समजून सांगितलं की, आधी ही मदत देणं गरजेचं आहे. मग स्थापन केलेल्या समितीचा अहवाल घेऊन त्याआधारावर आम्ही कर्जमाफी करू. त्यावर त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे", अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Government to Decide on Farm Loan Waiver by June 2026

Web Summary : Maharashtra govt. will decide on farm loan waiver by June 2026, based on a committee report. CM Fadnavis emphasized immediate financial aid for farmers, with ₹11,000 crore sanctioned and ₹8,500 crore already disbursed, to enable timely sowing and alleviate debt.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरीBacchu Kaduबच्चू कडूBachhu Kaduबच्चू कडूMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार