शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 17:54 IST

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बोगस मतदारांचे पुरावे सादर केले. राहुल गांधी यांच्या या आरोपांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मतांची चोरी झाली. लोकसभा निवडणुकीनंतर पाच महिन्याच्या कालावधीत अनेक मतदार नोंदवले गेले. एकाच व्यक्तीचे नाव अनेक ठिकाणी असल्याचे राहुल गांधींनी पुरावे दाखवले. राहुल गांधींच्या या आरोपावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टीका केली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

माध्यमांशी बोलताना एकनात शिंदे म्हणाले, "मी एवढंच सांगतो की, जेव्हा ते हरतात... आता बिहारच्या निवडणुकांमध्ये ते हरणार आहेत. याचा अंदाज आता त्यांना लागलेला आहे. त्यामुळे हे सगळं रडगाणं सुरू आहे. एक परिस्थिती तयार करण्याचे काम सुरू आहे", अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेतेपदावर राहुल गांधींवर केली.  

मनमोहन सिंग सरकारच्या काळात सगळ्यात मोठा स्कॅम -शिंदे

शिंदे पुढे बोलताना म्हणाले, "ते म्हणतील की, 'आम्ही म्हणालो होतो की, हे असं असं चाललेलं आहे. यामध्ये घोटाळा झाला. मतदानामध्ये चोरी केली.' मी एवढंच म्हणेल की, त्यांच्या काळात सगळ्यात मोठा निवडणूक आयोगामध्ये झालेला घोटाळा मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात मोठा स्कॅम... मनमोहन सिंग सरकारमध्ये निवडणूक आयोगाच्या प्रमुखांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मतदानाचा अधिकार सहा वर्षांसाठी काढून घेतला होता. किती मोठा स्कॅम होता." 

"तुम्हाला काय अधिकार आहे आमच्यावर आरोप करण्याचा. तुम्हाला काय अधिकार आहे मत चोरी म्हणण्याचा. जेव्हा हे हरतात, तेव्हा निवडणूक आयोग, ईव्हीएम या सगळ्यावर आरोप करतात. राहुल गांधी यांचा हा करंटेपणा आहे. राहुल गांधी यांना निवडणुकीचं, मतांचे आणि विरोधी पक्षनेतेपदाचे भान असायला पाहिजे", असे टीकास्त्र शिंदेंनी राहुल गांधींवर डागले.  

शिंदेंनी सांगितले वाढलेल्या मतांचे कारण

"हे केवळ निवडणूक आयोगाचा अपमान करत नाहीयेत. तर हा कोट्यवधी लाडक्या बहिणी, कोट्यवधी शेतकऱ्यांचा अपमान आहे. महाराष्ट्रातील तमाम जनतेचा अपमान आहे. एक लाख १८६ बूथ महाराष्ट्रात आहेत. एका बूथवर ७० मतांचं मतदान जास्त झाले, तर ७० लाख मते जास्त होतात. लाडकी बहीण योजना केल्यानंतर सर्वांनी ठरवलं की महायुतीला विजयी करायचं. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढला आणि हे ते मान्य करायला तयार नाहीत. राहुल गांधी फेक नरेटिव्ह पसरवण्याचे काम करत आहेत. जबाबदार विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी काम केले पाहिजे", असे एकनाथ शिंदे म्हणाले.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेRahul Gandhiराहुल गांधीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी