शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोग खिशात घालून फिरताहेत; प्रियांका गांधींना नोटीस पाठविल्यावरून वडेट्टीवारांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 11:11 IST

हमीभावाची पोकळ घोषणा करतात, हमाभावाने कुठे खरेदी सुरु आहे, सोयाबीन कापसाचे दर पडलेले आहेत. अधिवेशनात आम्ही सरकारला धारेवर धरू, असा इशाराही त्यांनी दिला.

प्रियांका गांधींना नोटीस पाठविल्यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर टीका केली आहे. भाजपावाले निवडणूक आयोग खिशात घालून फिरतात. खरेतर निवडणूक आयोग हा भाजपाचा झाला आहे. राम मंदिराचे दर्शन मोफत दाखवू म्हणत मत मागणाऱ्यांना नोटीस का नाही? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे. 

धार्मिक भावनांना हात घालून मत मागणे हे कुठल्या संविधानात, आचारसंहितेत आहे. कारवाई करायची असेल देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. त्यांना नोटीस द्यायला पाहिजे, हे सगळा घाबरल्याचा परिणाम आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. 

अधिवेशनापूर्वी जर सरकारला लाज-लज्जा असेल तर त्यांनी केलेल्या घोषणांची पूर्तता करावी. शेतकऱ्यांना निधी उपलब्ध करून द्यावा. प्रोत्साहनपर 50 हजार रुपये देणार होते, ते अद्याप मिळालेले नाहीत. आम्ही सरकारच्या लक्षात आणून दिल्यावर दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढवली गेली, मदतीची घोषणा केली आहे, मात्र मदत मिळालेली नाही, अश टीका विरोधी पक्षनेत्यांनी केली. 

हमीभावाची पोकळ घोषणा करतात, हमाभावाने कुठे खरेदी सुरु आहे, सोयाबीन कापसाचे दर पडलेले आहेत. अधिवेशनात आम्ही सरकारला धारेवर धरू, असा इशाराही त्यांनी दिला. धान पीक निघायला सुरवात झाली असल्याने सातशे रुपये बोनस मागणी करत आहे. सरकारकडून अद्याप पूर्तता झाली नाही. सरकारने लवकरात लवकर बोनस द्यावे. व्यापाऱ्यांच्या घशात धान गेल्यानंतर घोषणा सरकार करणार आहे का? असा सवाल करत राजू शेट्टींची तीच मागणी आहे. आजच्या चर्चेनंतर आम्ही त्या संदर्भात बोलू, असेही ते म्हणाले. 

कुठल्या जागा कोणासाठी मेरिटवर या संदर्भातील चर्चा स्थानिक पातळीवर सुरु आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीत संदर्भात निकाल आल्यानंतर जागावाटप संदर्भातही चर्चा होईल. देशाचे राजकारण करणारे विष पसरवणारे या देशातून हाकलले पाहिजेत. सत्ता उलथून लावण्यासाठी एक मुखी निर्णय इंडिया आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.  

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग