शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
3
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
4
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
5
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
6
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
7
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
8
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
9
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
10
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
11
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
12
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
13
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
14
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
15
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
16
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
17
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
18
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
19
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
20
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?

राज्यात लशींचा तुटवडा, हे 'महावसुली' आघाडी निर्मित संकट; भाजपचा ठकरे सरकारवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 6:25 PM

"तीन लाख लशींचा साठा आपण राखीव ठेवला आहे, तो का ठेवला? तो जर ठेवला नसता, तर आज आपण जे सांगत आहात, की लस देणे बंद करावे लागले आहे, ते बंद करावे लागले नसते."

मुंबई - राज्यात एकीकडे कोरोना रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण कार्यक्रमही सुरू आहे. मात्र, यातच राज्यात लशींचा तुटवडा होत असल्याची तक्रार राज्यातील ठाकरे सरकारने केंद्राकडे केली आहे. याच मुद्द्यावर आता महाराष्ट्र भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ठाकरे सरकारवर 'महावसुली' आघाडी सरकार म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. यासंदर्भातील व्हिडिओदेखील सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. (The shortage of vaccines in the state is a crisis created by the State government says BJP) 

या व्हिडिओत उपाध्ये यांनी म्हटले आहे, की "राज्यात निर्माण झालेला कोरोना लशींचा तुडवडा हे 'महावसुली' आघाडी निर्मित संकट आहे. खरे तर, या सरकारने हिशेब द्यायला हवा, की लसीकरण सुरू झाल्यापासून जे पात्र आहेत, त्यांनाच लशी दिल्या गेल्या, की जे निकशात बसत नव्हते त्यांनाही लशी दिल्या गेल्या. काही खास लोकांना, काही लाडक्या लोकांना लशी दिल्या गेल्यात का? नियम मोडून काही लशी दिल्या गेल्यात का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत," असे उपाध्ये यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात लॉकडाउन लागणार की नाही? राजेश टोपेंनी सांगितला ठाकरे सरकारचा 'इरादा'

या शिवाय, तीन लाख लशींचा साठा आपण राखीव ठेवला आहे, तो का ठेवला? तो जर ठेवला नसता, तर आज आपण जे सांगत आहात, की लस देणे बंद करावे लागले आहे, ते बंद करावे लागले नसते. गेल्या दोन-तीन महिन्यांत लसिकरण झाल्यापासून लशी नेमक्या कुणाला दिल्या? याचा हिशेब महाराष्ट्र सरकारने द्यायला हवा, अशी मागणीही उपाध्ये यांनी केली आहे.

"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"

राज्यात 120 सेंटर्सपैकी 70 सेंटर्स बंद, कारण लशी संपल्या आहेत - टोपे महाराष्‍ट्रातील लशींच्या कमतरतेवर बोलताना टोपे म्हणाले, राज्यात कोरोना लसीकरणाचा वेग देशात सर्वात जास्त आहे. यामुळे प्रत्येक महिन्याला 1 कोटी 60 लाख लशींची आवश्यकता आहे. मात्र, अद्याप केवळ 1 कोटी 04 लाख लशीच दिल्या गेल्या आहेत. राज्यात 120 सेंटर्स आहेत, यांपैकी 70 बंद आहेत. कारण लशी संपल्या आहेत. लसीकरण केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे. अनेक सुविधा असूनही लोकांना लस देणे अशक्य होत आहे.

केंद्र सरकारकडून सर्वाधिक लशी महाराष्ट्रालाच देण्यात आल्या आहेत. मात्र, असे असतानाही महाराष्ट्रातूनच लशींच्या कमतरतेची तक्रार आली आहे. यावर टोपे म्हणाले, महाराष्ट्राची तुलना गुजरात अथवा राजस्थानसोबत केली जाऊ शकत नाही. लोकसंख्या अथवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राची तुलना छोट्या राज्यांशी होऊ शकत नाही. कारण सर्वाधिक केसलोड याच राज्यावर आहे. मात्र, जेव्हा देशातील एकूण कोरोनाबाधितांपैक्षा 60 टक्के कोरोनाबाधित एकट्या महाराष्ट्राचे असतील, तर लशीही त्याच प्रमाणात भेटायला हव्यात.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या