शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
2
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
3
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
4
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
5
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
6
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
7
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
8
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
9
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
10
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
11
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
12
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
13
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
14
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
15
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
16
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
17
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
18
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
19
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
20
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात लशींचा तुटवडा, हे 'महावसुली' आघाडी निर्मित संकट; भाजपचा ठकरे सरकारवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 18:25 IST

"तीन लाख लशींचा साठा आपण राखीव ठेवला आहे, तो का ठेवला? तो जर ठेवला नसता, तर आज आपण जे सांगत आहात, की लस देणे बंद करावे लागले आहे, ते बंद करावे लागले नसते."

मुंबई - राज्यात एकीकडे कोरोना रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण कार्यक्रमही सुरू आहे. मात्र, यातच राज्यात लशींचा तुटवडा होत असल्याची तक्रार राज्यातील ठाकरे सरकारने केंद्राकडे केली आहे. याच मुद्द्यावर आता महाराष्ट्र भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ठाकरे सरकारवर 'महावसुली' आघाडी सरकार म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. यासंदर्भातील व्हिडिओदेखील सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. (The shortage of vaccines in the state is a crisis created by the State government says BJP) 

या व्हिडिओत उपाध्ये यांनी म्हटले आहे, की "राज्यात निर्माण झालेला कोरोना लशींचा तुडवडा हे 'महावसुली' आघाडी निर्मित संकट आहे. खरे तर, या सरकारने हिशेब द्यायला हवा, की लसीकरण सुरू झाल्यापासून जे पात्र आहेत, त्यांनाच लशी दिल्या गेल्या, की जे निकशात बसत नव्हते त्यांनाही लशी दिल्या गेल्या. काही खास लोकांना, काही लाडक्या लोकांना लशी दिल्या गेल्यात का? नियम मोडून काही लशी दिल्या गेल्यात का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत," असे उपाध्ये यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात लॉकडाउन लागणार की नाही? राजेश टोपेंनी सांगितला ठाकरे सरकारचा 'इरादा'

या शिवाय, तीन लाख लशींचा साठा आपण राखीव ठेवला आहे, तो का ठेवला? तो जर ठेवला नसता, तर आज आपण जे सांगत आहात, की लस देणे बंद करावे लागले आहे, ते बंद करावे लागले नसते. गेल्या दोन-तीन महिन्यांत लसिकरण झाल्यापासून लशी नेमक्या कुणाला दिल्या? याचा हिशेब महाराष्ट्र सरकारने द्यायला हवा, अशी मागणीही उपाध्ये यांनी केली आहे.

"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"

राज्यात 120 सेंटर्सपैकी 70 सेंटर्स बंद, कारण लशी संपल्या आहेत - टोपे महाराष्‍ट्रातील लशींच्या कमतरतेवर बोलताना टोपे म्हणाले, राज्यात कोरोना लसीकरणाचा वेग देशात सर्वात जास्त आहे. यामुळे प्रत्येक महिन्याला 1 कोटी 60 लाख लशींची आवश्यकता आहे. मात्र, अद्याप केवळ 1 कोटी 04 लाख लशीच दिल्या गेल्या आहेत. राज्यात 120 सेंटर्स आहेत, यांपैकी 70 बंद आहेत. कारण लशी संपल्या आहेत. लसीकरण केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे. अनेक सुविधा असूनही लोकांना लस देणे अशक्य होत आहे.

केंद्र सरकारकडून सर्वाधिक लशी महाराष्ट्रालाच देण्यात आल्या आहेत. मात्र, असे असतानाही महाराष्ट्रातूनच लशींच्या कमतरतेची तक्रार आली आहे. यावर टोपे म्हणाले, महाराष्ट्राची तुलना गुजरात अथवा राजस्थानसोबत केली जाऊ शकत नाही. लोकसंख्या अथवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राची तुलना छोट्या राज्यांशी होऊ शकत नाही. कारण सर्वाधिक केसलोड याच राज्यावर आहे. मात्र, जेव्हा देशातील एकूण कोरोनाबाधितांपैक्षा 60 टक्के कोरोनाबाधित एकट्या महाराष्ट्राचे असतील, तर लशीही त्याच प्रमाणात भेटायला हव्यात.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या