शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

शेततळ्यांच्या घोषणेचे मराठवाड्यात ‘बाष्पीभवन’

By admin | Updated: September 15, 2015 01:47 IST

‘मागेल त्याला शेततळे’ देण्याच्या राज्य सरकारच्या घोषणेला १५ दिवस उलटल्यानंतरही त्यासंबंधीचे लेखी आदेशच मिळाले नसल्याने दुष्काळ निवारणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना

औरंगाबाद : ‘मागेल त्याला शेततळे’ देण्याच्या राज्य सरकारच्या घोषणेला १५ दिवस उलटल्यानंतरही त्यासंबंधीचे लेखी आदेशच मिळाले नसल्याने दुष्काळ निवारणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या व त्यासाठी पैसे कमी न पडू देण्याच्या घोषणेचे एकप्रकारे ‘बाष्पीभवन’ झाल्याचे चित्र आहे.मराठवाड्यात तीन वर्षांत सुमारे दीड लाख शेततळी बांधण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी भागाच्या दौऱ्यात केली होती. मात्र संबंधित आदेश निघण्यासाठी आणखी १०-१५ दिवसांचा कालावधी लागेल, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. त्यावरून दुष्काळासंबंधी सरकारच्या कामाची गतीही लक्षात येत आहे. आघाडी सरकारच्या काळात मराठवाड्यात शेततळ्यांचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. आताही अनेक शेतकरी सरकार दरबारी खेटे मारत आहेत़ शेततळ्यांच्या कामांचे २०१३ पासून नांदेड जिल्ह्याला उद्दिष्टच न दिल्याने बहुतांश शेतकरी योजनेपासून वंचित आहेत. २००७ ते २०१२ कालावधीत ६ हजार ८२६ शेतकऱ्यांनी शेततळ्यांचा लाभ घेतला. परभणीत केवळ जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २२८ शेततळ्यांची कामे सुरू असून १५४ कामे पूर्ण झाली आहेत.हिंगोली जिल्ह्यात जॉबकार्डअभावी अनेकांना शेततळी मिळत नाहीत. (प्रतिनिधी)विहिरींची कामे रखडली रोहयोअंतर्गत मराठवाड्यात हजारो विहिरी मंजूर झाल्या; मात्र त्यातील निम्म्याही पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत. कामे कासव गतीने सुरू आहेत. बीड जिल्ह्यात साडेसहा हजार विहिरी रखडल्या आहेत. उस्मानाबादमध्ये एक हजाराहून अधिक कामे संथ गतीने सुरू आहेत. नांदेडमध्ये ७ हजार ५०० सिंचन विहिरींची कामे अपूर्णावस्थेतच आहेत़ परभणीत ५३५ सिंचन विहिरींना अजूनही कार्यादेशाची प्रतीक्षा आहे. हिंगोलीत २,२३१ विहिरींना मंजुरी असताना केवळ ८१३ पूर्ण झाल्या आहेत.