शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

निकालाआधीच शिवसेनेकडून दबावतंत्राला सुरुवात ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 3:11 PM

खासदार संजय राऊत यांनी देखील शिवसेनेशिवाय भाजपला राज्य करता येणार नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे निकालाआधीच शिवसेनेकडून दबावतंत्र सुरू करण्यात आलं का, असा सवाल उपस्थित होत आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीत यंदा पुन्हा एकदा कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळेल अशी स्थिती नाही. किंबहुना भाजप व्यतिरिक्त कोणताही प्रमुख पक्ष बहुमताच्या आकड्यापेक्षा अधिक जागाही लढवत नाही. त्यामुळे स्पष्ट बहुमताची शक्यता कमी आहे. तर सर्वाधिक जागा लढवत असलेल्या भाजपलाही बहुमत मिळेल असं चित्र मतचाचण्यांमध्ये दिसले नाही. त्यामुळे शिवसेनेने निकालाआधीपासूनच दबावतंत्र सुरू केले आहे.

2014 मध्ये राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी भाजपने सत्तेचा दावा केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी निकालाच्या दिवशीच भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिवसेनेचे महत्त्व झपाट्याने कमी झाले. या पाठिंब्यावर भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली. तर शिवसेना विरोधी बाकावर विराजमान झाली. तरी भाजपने शिवसेनेला सरकारमध्ये घेतले. परंतु, सत्तेत सहभागी झालेल्या शिवसेनेला मनासारखी मंत्रीपदे मिळाली नाही. किंबहुना पाच वर्षे शिवसेनेने भाजपवर टीका करण्यातच घालवले.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेला सोबत घेण्याचा इरादा केला. त्यानुसार दोन्ही पक्ष एकत्र लढत आहेत. मात्र अनेक ठिकाणी उभय पक्षांचे बंडखोर एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न सुरू आहे. या बंडखोरांना पक्षांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात येते. तर नितेश राणे यांच्याविरुद्ध शिवसेनेने उमेदवार दिला. त्यामुळे युती असली तरी उभय पक्षात धुसफूस सुरूच असल्याचे स्पष्ट होते.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार असून मत चाचण्यांमध्ये स्पष्ट बहुमत कोणत्याही एका पक्षाला नसल्याचे सांगण्यात आहे. त्यानुसार शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपदासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. खासदार संजय राऊत यांनी देखील शिवसेनेशिवाय भाजपला राज्य करता येणार नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे निकालाआधीच शिवसेनेकडून दबावतंत्र सुरू करण्यात आलं का, असा सवाल उपस्थित होत आहे.