शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
2
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
3
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
4
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
5
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
6
Top Marathi News Live: नाशिक: भोंदू अशोक खरातविरुद्ध SITकडून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
7
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
8
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
9
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
10
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
11
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
13
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
14
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
15
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
16
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
17
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
18
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
19
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
20
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही ‘अच्छे दिन’ नाहीच

By admin | Updated: July 3, 2014 01:02 IST

अभियांत्रिकीच्या केंद्रीभूत प्रवेशाकरिता अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारी विद्यार्थ्यांना अखेरची संधी आहे. मात्र विद्यार्थ्यांपेक्षा जास्त तणाव असेल तो महाविद्यालयांच्या प्रशासनावर.

अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया : आतापर्यंत केवळ ६५ टक्केच अर्ज दाखल
नागपूर : अभियांत्रिकीच्या केंद्रीभूत प्रवेशाकरिता अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारी विद्यार्थ्यांना अखेरची संधी आहे. मात्र विद्यार्थ्यांपेक्षा जास्त तणाव असेल तो महाविद्यालयांच्या प्रशासनावर. आतापर्यंत नागपूर विभागात एकूण उपलब्ध जागांच्या तुलनेत केवळ ६५ टक्के अर्जांची छाननी झाली आहे. एकूणच विद्यार्थ्यांच्या निरुत्साहामुळे यंदादेखील मोठ्या प्रमाणावर जागा रिकाम्या राहणार व अर्ज दाखल केलेल्या प्रत्येकाला सहजपणे प्रवेश मिळणार, असेच चित्र दिसून येत आहे. परंतु कमी प्रमाणात अर्ज आल्यामुळे महाविद्यालयांच्या चिंतेत निश्चितपणे वाढ झाली आहे.
२३ जूनपासून अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली होती. शहरात मोठ्या प्रमाणावर एआरसी केंद्रे असूनदेखील विद्यार्थ्यांची म्हणावी तशी गर्दी झालीच नव्हती. तंत्रशिक्षण संचालनालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार बुधवार २ जुलैपर्यंत १५,८१९ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. जर विभागात उपलब्ध असलेल्या २४,३९२ हजार जागांच्या तुलनेत याची टक्केवारी काढली तर ती अवघी ६४.८५ टक्के भरते. ३ जुलै रोजी ‘आॅनलाईन’ अर्ज दाखल करून कागदपत्रांची पडताळणी व अर्जाचे सत्यापन करण्याची अखेरची तारीख आहे.
व्यवस्थापन कोट्यावर भिस्त
मागील काही वर्षांमध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची क्रेझ कमी झाली आहे.
नागपूर विभागात अभियांत्रिकीची ५७ महाविद्यालये आहेत.
यातील काही मोजक्या महाविद्यालयांनाच विद्यार्थ्यांकडून प्रवेशाकरिता पसंती देण्यात येते. इतर महाविद्यालयांना प्रवेश मिळविण्यासाठी कसरतच करावी लागते. त्यामुळे बहुतांश महाविद्यालयांनी व्यवस्थापन कोट्यातून जागा भरण्यावरच भर ठेवला होता.(प्रतिनिधी)
अर्ज दाखल करण्याची मुदत वाढणार?
मागील दोन वर्षांप्रमाणे यंदादेखील इतक्या कमी प्रमाणात अर्ज आल्यामुळे महाविद्यालयांचे धाबे दणाणले आहे. बारावीच्या निकालात सुमारे १६ टक्क्यांची वाढ झाली होती. त्यामुळे यंदा अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येतील, अशी शक्यता होती. परंतु हे अंदाज चुकल्याचेच अर्जांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. दरम्यान, आॅनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत वाढविली जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासंदर्भात तंत्रशिक्षण संचालनालयाच्या विभागीय कार्यालयाकडे बुधवारपर्यंत तरी कुठलीही सूचना आली नव्हती.