शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

सरकारला शाप लागतील; मूकबधिरांना झालेल्या मारहाणीवरुन राज ठाकरे बसरले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 9:16 PM

सरकारला फक्त खाबुगिरीत रस असल्याचा राज यांचा आरोप

पुणे: मूकबधिरांना झालेल्या मारहाणीवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे सरकारवर बरसले आहेत. ज्यांना बोलता येत नाही, ऐकता येत नाही, अशांवर लाठीमार कसला करता?, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. मूकबधिरांना शिकण्याची, स्वत:च्या पायांवर उभं राहण्याची इच्छा आहे. शिक्षक मिळावेत, यासाठी ते आंदोलन करत आहेत. मात्र सरकार त्यांच्यावर लाठीमार करत आहे. या सरकारला नक्कीच त्या मुलांचे शाप लागतील, अशा शब्दांमध्ये राज यांनी सरकारला लक्ष्य केलं. राज ठाकरे यांनी आंदोलनकर्त्या मुलांची भेटदेखील घेतली.मूकबधिरांना पोलिसांकडून मारहाण होते, ही गोष्ट अतिशय दुर्देवी असल्याचं राज ठाकरे म्हणाले. 'मूकबधिरांना मारहाण करण्याचे आदेश कोणी दिले, हा प्रश्न आहे. ज्यांनी हे आदेश दिले, त्यांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा घ्यावा,' अशी मागणी राज यांनी केली. आंदोलनकर्त्या मुलांच्या मागणीत चुकीचं काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 'त्या मुलांना शिक्षण घ्यावंसं वाटतं आहे. त्यांना शिकायचं आहे. त्यासाठी त्यांना शिक्षक हवेत. त्यामध्ये चुकीचं काय?' असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी सांगूनही अधिकारी ऐकत नसतील, तर मग सरकारचा उपयोग काय, असा सवालही त्यांनी विचारला. मूकबधीर मुलांची भेट घेतल्यानंतर राज यांनी फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली. सरकार फक्त खाबुगिरीत गुंग आहे. त्यांना या मुलांशी काहीही देणंघेणं नाही. फक्त पैशांवर निवडणुका जिंकायच्या आणि पैसा कमवायचा हेच सुरू आहे. त्यामुळे आता या सरकारला आधीच्या सरकारला दोष देण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांमध्ये राज ठाकरे सरकारवर बरसले. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आंदोलनकर्त्यांच्या मागण्या त्यांना सांगण्याचा प्रयत्न करू, असंदेखील त्यांना सांगितलं. ठिय्या दिलेल्या मुलांची सोय करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliceपोलिस