शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 12:29 IST

Manoj Jarange Patil News: पुढील १०० वर्षे समाजबांधवांना उपयुक्त असेल, असे मराठा आरक्षण मिळवून देणार, अशी गॅरंटी देत, देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत मराठा समाजावर अन्याय होतच राहणार, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.

Manoj Jarange Patil News: मराठा समाजाला आरक्षण मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत २९ ऑगस्टला आरक्षण मिळवून देणार ते पुढील १०० वर्षे समाजबांधवांना उपयुक्त असेल. आरक्षण कुणाच्या बापाची जहागिरी लागली नाही. ऑगस्टमध्ये मुंबई लाखो मराठा बांधवांनी जमावे आरक्षण घेऊनच दाखवतो कोण देणार नाही आरक्षण आरक्षण द्यावेच लागेल, असा एल्गार मनोज जरांगे पाटील यांनी केला. 

किल्ले रायगडवरील शिवराज्याभिषेक निमित्त मनोज जरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत मराठा समाजावर असाच अन्याय होतच राहणार. त्या माणसाला मराठा समाजाबाबत इतका द्वेष आहे, इतका आकस आहे. मराठा समाजाला वाईट वागणूक देतात. त्यामुळे देशमुख परिवाराला छत्रपती शिवरायांच्या समोर येऊन नतमस्तक व्हावे लागत आहे. अन्यथा न्याय मिळण्याची मागणी करावी लागली नसती. न्याय आणि आशीर्वाद शेवटी राजांकडून मिळतील. याचा अर्थ असा होतो की, देवेंद्र फडणवीस मराठ्यांना न्याय देणार नाहीत.

देवेंद्र फडणवीस यांनीच डाव मांडला आहे

देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण दाबले आहे. या प्रकरणाची पद्धतशीरपणे विल्हेवाट लावली. लोकप्रतिनिधींनी दोष देऊन उपयोग नाही. कारण हे तुम्हीच घडवून आणले. परंतु, समाज हा देशमुख कुटुंबासोबत आहे. आम्ही आहोत ना, कशी काय सूट देतात तेच पाहतो. देवेंद्र फडणवीस यांनीच डाव मांडला आहे. या प्रकरणातील अनेकांना सहआरोपी केलेले नाही, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. 

दरम्यान, दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इतका दुजाभाव ठेवता कामा नये. सगळ्या जनतेचे जर मत हे ०६ जून असेल, तर त्याच तारखेला व्हायला हवा. दोन राज्याभिषेक सोहळा करण्याचा घाट विनाकारण घालता कामा नये. समाज दूषित होईल, असे वागू नये. संस्कार हिंदू धर्माचे, राज्याचे, देशाचे सांगायचे. छत्रपती शिवरायाचे विचार सांगायचे. मग एकाच जागेवर एकत्र शिवराज्याभिषेक सोहळा का नाही करायचा. याचा अर्थ तुमची भूमिका दुटप्पी आहे. तुम्हाला दाखवायचे एक आहे आणि करायचे एक आहे. तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही, या शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी निशाणा साधला.

 

टॅग्स :Shivrajyabhishekशिवराज्याभिषेकShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजRaigadरायगडMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस