शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 16:55 IST

Manoj Jarange Patil Dasara Melava 2025: रुग्णालयात उपचार सुरू असूनही दसरा मेळाव्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थिती लावली.

Manoj Jarange Patil Dasara Melava 2025: विजयादशमी दसरा संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा होत आहे. महाराष्ट्रात दसऱ्याच्या निमित्ताने राजकीय आखाडाही रंगतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंकजा मुंडे, मनोज जरांगे पाटील यांचे दसरा मेळावे जोरदार झाले. यासह ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाचाही दसरा मेळावा आहे. रुग्णालयात उपचार सुरू असूनही दसरा मेळाव्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थिती लावली. बीडमधील नारायण गडावर दसरा मेळाव्यात बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी पुढील आंदोलनाचा इशारा दिला. 

छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, आणि धर्मवीर संभाजीराजे यांना वंदन करून मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. याच दरम्यान “मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे...”, असे म्हणत भावनिक साद घातली. खूप वेदना आहेत, शरीराला त्रास होत आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, आठवत असली तर बघा. एक पाच, सहा महिन्यांपूर्वी एक गोष्टी सांगितली होती. शेवटी शरीर आहे. काही सांगता येत नाही. माझ्या गरिबाच्या लेकराच्या आयुष्याचे कल्याण करू द्या, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. 

सरकारने मदत दिली नाही तर आंदोलन करणार

मी सरकारला जाहीरपणाने सांगत आहे की, मराठवाडा आणि लगतच्या जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा. त्याशिवाय माघार नाही. हे काम दिवाळीच्या आत करायचे आहे. सरकारने दिवाळीच्या आत ओला दुष्काळ जाहीर करायचा आहे. सरकारने कॅश द्यावी. आता शेतकऱ्यांची खरी फाईट सुरू झाली आहे. ज्यांचे शेत वाहून गेले नाही, त्यांना सरसकट ७० हजार रुपये हेक्टरी मदत करा. ज्यांच्या नदीच्या शेजारचे वावर वाहून गेलेत, पीक वाहून गेले त्यांना १ लाख ३० हजार रुपये भरपाई म्हणून द्यावी. ज्यांचे जनावरे वाहून गेले, कांदा वाहून गेला, सोयाबीन वाहून गेले, धान्य वाहून गेले त्या लोकांचे शेतकरी सांगेल तसा पंचनामा करून शंभर टक्के भरपाई द्यावी. सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला सरकारी नोकरी द्यावी. सरकारने मदत दिली नाही तर आंदोलन करणार, सरकारला एक महिन्याची मुदत देत आहोत, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

दरम्यान, शेतकऱ्याचे ऊसाचे पंधरा रुपये कापायचे ठरवले आहे. अजिबात एक रुपया कापायचा नाही. याला पर्याय म्हणून ज्या सरकारी कर्मचाऱ्याला दहा हजार रुपये पगार आहे. त्याचे अडीच हजार रुपये कापा. ज्याला वीस हजार रुपये पगार आहे त्याचे पाच हजार रुपये कापा. ज्याला १ लाख पगार आहे त्याचे २५ हजार रुपये कापा. ज्याला २ लाख रुपये पगार आहे त्याचे ५० हजार रुपये कापा. चार-पाच लाख अधिकाऱ्यांचे पैसे कापले तर जवळपास हजार कोटी रुपये जमा होतील. फडणवीस, शिंदे, ठाकरे, राणे, पवारांसह राजकीय नेत्यांची संपत्ती घ्या, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलRainपाऊसfloodपूरFarmerशेतकरीFarmers Protestशेतकरी आंदोलन