शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: उद्धव यांनी पुन्हा सिद्ध केले नेतृत्व

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 5:19 AM

पाच वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहासह केंद्र व राज्य सरकारवर वारेमाप टीका करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे योग्य वेळी युतीच्या गाडीत जाऊन बसले.

- यदु जोशीपाच वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहासह केंद्र व राज्य सरकारवर वारेमाप टीका करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे योग्य वेळी युतीच्या गाडीत जाऊन बसले. पाच वर्षांत सत्तापक्ष आणि विरोधी पक्ष अशा दोन्हीही भूमिकेत शिवसेना राहिली आणि त्यांनी विरोधी पक्षांची ‘स्पेस’देखील भरून काढली. मात्र निवडणूक लागताच काळाची गरज ओळखून भूमिका बदलली. उद्धव यांनी ऐनवेळी भूमिका बदलली तरी शिवसैनिक त्यांच्यासोबत राहिले. राज ठाकरेंनी भूमिका बदलून ते काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला गेले पण मनसैनिक त्यांच्यासोबत गेले नाहीत. हा दोन भावांमधील फरक आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंकडून लाभलेला राजकीय वारसा टिकवून ठेवणे किंबहुना तो अधिक समृद्ध करणे हे उद्धव यांच्या पुढचे आव्हन होते. मात्र उद्धव यांनी मोदी-शहा-फडणवीसांच्या प्रभावातही शिवसेना टिकवली. शिवसेना फुटणार, शिवसेनेत असंतोष आहे, अशा बातम्या येत असतानाही अत्यंत धिरोदत्तपणे उद्धव यांनी संघटना बांधून ठेवली. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचे नेते त्यांच्यावर तुटून पडलेले असताना त्यांनी महापालिकेवर भगवा फडकावला. लोकसभा निवडणुकीत युती करताना त्यांनी भाजप नेतृत्वास आपल्या अटी मान्य करण्यास भाग पाडले. देशात मोदींंची लाट असल्याचे अचूक ओळखत भाजपशी युती करण्याचे मुत्सद्दीपण उद्धव ठाकरे यांनी दाखविले. त्यासाठी यूटर्न घेतला.>भाकरी परतवली नाहीअनंत गीते, शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी बदलली असती तर चित्र वेगळे असते. योग्य वेळी भाकरी परतवली नाही. शिवसेनेचे काही जण मोदीलाटेने तरले.भाजपसोबत किती ताणायचे आणि कुठे थांबायचे याचे अचूक भान उद्धव ठाकरे यांनी दाखवत युती केली. २०१४ प्रमाणे याहीवेळी मोदी लाटेचा शिवसेनेला मोठा फायदा झाला.शिवसेना हा भाग्यवान पक्ष आहे. गळ्यात भगवा दुपट्टा टाकून भगवा टिळा लावला अन् जय भवानी-जय शिवाजी म्हटलं की शिवसैनिक चार्जड् होतो. पक्षासाठी पदरचे पैसे खर्च करणाऱ्या शिवसैनिकांचाही हा विजय आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019