शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Mini Lockdown: राज्यात दारूची दुकानं पण बंद होणार का? आरोग्य मंत्र्यांनी तळीरामांना झापलं, काय म्हणाले वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 20:12 IST

Maharashtra Mini Lockdown: राज्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर शनिवारी राज्य सरकारनं निर्बंधांची नवी नियमावाली (Maharashtra corona guidelines) जाहीर केली आहे.

Maharashtra Mini Lockdown: राज्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर शनिवारी राज्य सरकारनं निर्बंधांची नवी नियमावाली (Maharashtra corona guidelines) जाहीर केली आहे. यानुसार राज्यात आज मध्यरात्रीपासून नव्या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्यात १५ फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच अनेक निर्बंध लागू करण्यात आलेले आहे. पण नव्या नियमावलीमध्ये मंदिरं, धार्मिक स्थळांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. तसंच मद्यविक्रीबाबतही कोणत्याही सूचना किंवा निर्बंध लागू करण्यात आलेले नाहीत. 

राज्य सरकारच्या नव्या नियमावलीवर टीका करताना आमदार सदाभाऊ खोत यांनी आज राज्यात 'ग्लास' सुरू आणि 'क्लास' बंद, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असं म्हणत सरकारकडून मद्यविक्रीवर कोणतेही निर्बंध लागू न करण्यात आल्याबद्दल टीका केली आहे. राज्यात दारूवरील टॅक्स कमी केला जातो आणि शाळा बंद केल्या जातात असा अजब कारभार सुरू असल्याचं खोत म्हणाले. राज्य सरकारवर नव्या नियमावरून जोरदार टीका होत असताना आता राज्याचे आरोग्यमंत्री 
राजेश टोपे यांचंही विधान समोर आलं आहे. 

राज्यात नागरिकांनी गर्दी करणं जर असंच सुरू ठेवलं तर मंदिरं, धार्मिक स्थळं आणि मद्यविक्रीची दुकानं देखील बंद केली जातील असा इशाराच दिला आहे. "राज्यात जोवर ऑक्सिजनची मागणी ७०० मेट्रीक टनांवर पोहोचत नाही आणि रुग्णालयातील उपलब्ध बेड्सपैकी ४० टक्के बेड्स भरले जात नाहीत तोवर नवे निर्बंध लागू करण्याचा सरकारचा कोणताही इरादा नाही. पण लोकांनी जर रस्त्यावर निष्काळजीपणे वागून गर्दी करणं सुरूच ठेवलं तर मद्यविक्रीसह इतर दुकानांवरही कडक निर्बंध लावावे लागतील", असं स्पष्ट केलं आहे. 

कोरोना वाढला तर मंदिरं देखील होणार बंद
"गर्दी वाढली आणि नियमांचं पालन होताना दिसलं नाही तर मद्यविक्रीचीही दुकानं बंद केली जातील. यासोबत धार्मिक स्थळं देखील बंद करण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागेल", असं राजेश टोपे म्हणाले. राज्यात सध्या ऑक्सिजनची मागणी साडेचारशे मेट्रिक टनच्या जवळ पोहोचली आहे. त्यामुळे सध्यातरी निर्बंध आणखी कठोर करण्याची गरज नसल्याचंही टोपे म्हणाले. परिस्थितीत बदल होईल तसे निर्णय घेण्यात येतील. कारण कोरोना रुग्णसंख्या वाढली तर महामारीला नियंत्रित करणं खूप कठीण होऊन बसेल, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRajesh Topeराजेश टोपेcorona virusकोरोना वायरस बातम्या