शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

...हा तर बाळासाहेबांचा अपमान! बंद खोलीतील चर्चेवरून संजय राऊतांचे अमित शहांना जोरदार प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 10:42 AM

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असे आम्ही घोषित केले, तेव्हा शिवसेनेने आक्षेप घेतला नाही, अशी विचारणा करणारे भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई - देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असे आम्ही घोषित केले, तेव्हा शिवसेनेने आक्षेप घेतला नाही, अशी विचारणा करणारे भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अमित शहा यांनी बंद खोलीमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील उघड करण्यास नकार दिला आहे. मात्र ही चर्चा ज्या बंद खोलीत झाली ती भाजपासाठी केवळ एक खोली असेल. मात्र आमच्यासाठी मंदिरासारखी आहे. आमचे श्रद्धास्थान आहे. येथे झालेली चर्चा नाकारणे हा बाळासाहेबांचा अवमान आहे. या खोलीतच मुख्यमंत्रिपदासह सत्तेच्या समसमान वाटपाचा फॉर्म्युला ठरला होता, हे मी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, असे संजय राऊत म्हणाले. अमित शहांनी 50-50 फॉर्म्युल्याबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, ''महाराष्ट्रात महायुती जिंकेल आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशीच आमची भूमिका होती. पंतप्रधान मोदी व मी तसे जाहीर केले होते. तेव्हा शिवसेनेने आक्षेप का घेतला नाही, असे वक्तव्य अमित शाहा यांनी केले आहे. मात्र पंतप्रधानांना खोटे पाडण्याची आमची इच्छा नव्हती. तसेच केले असते तर तो या देशाच्या पंतप्रधानांचा अपमान झाला असता. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांपेक्षा आम्ही मोदींचा आदर करतो. त्यामुळे आम्ही हस्तक्षेप केला नाही. मात्र आम्हीही शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपद आणि सत्तेच्या समसमान वाटपाचा आम्ही वारंवार उल्लेख करत होतो. तेव्हा अमित शहा यांनी हे का नाकारले नाही''  यावेळी बाळासाहेबांच्या खोलीत झालेल्या चर्चेवरून राऊत यांनी भाजपावर जोरदार टोला लगावला.''सत्तेच्या वाटपाबाबत ज्या खोलीत चर्चा झाली ती खोली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती. या खोलीमधूनच बळासाहेबांनी हिंदुत्वाचा नारा अनेकदा दिला होता. तसेच मोदींसह अनेक बड्या नेत्यांना आशीर्वाद दिला होता. आता तीत चर्चा नाकारणे हा बाळासाहेबांचा अवमान आहे. या खोलीतच मुख्यमंत्रिपदासह सत्तेच्या समसमान वाटपाचा फॉर्म्युला ठरला होता, हे मी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो. आता बंद खोलीमधील चर्चा बाहेर कशा आल्या अशी विचारणा भाजपावाले करत आहेत. मात्र बंद खोलीतल्या चर्चा बाहेर का आल्या. तुम्ही ती चर्चा आणि ठरलेली गोष्ट मान्य केली असती तर बंद खोलीत झालेली चर्चा बाहेर आली नसती.  बंद दाराआड झालेल्या चर्चेचा विषय हा दिल्या घेतल्या शब्दाचा आणि वचनाचा होता. महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा होता. स्वाभिमानाचा होता, असेही संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAmit Shahअमित शहाShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार