शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

"आमचे १० आमदार निवडून आले तर..."; १० वर्षांनी महाराष्ट्रात आलेल्या अकबरुद्दीन ओवैसींचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 15:20 IST

छत्रपती संभाजीनगर येथे एमआयएम उमेदवारांच्या प्रचारासाठी अकबरुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा घेण्यात आली. या सभेतून ओवैसींनी महायुतीसह महाविकास आघाडीवर टीका केली. 

छत्रपती संभाजीनगर - महाराष्ट्राच्या राजकारणात इम्तियाज जलील यांच्यासह अकबरुद्दीनही खांद्याला खांदा लावून उभा राहणार. औरंगाबाद, नांदेड, उस्मानाबाद, सोलापूर असो वा मुंबई हा अकबरुद्दीन ओवैसी कायम इथं येत राहणार. जीवनात मी कधीही मत मागितले नाही पण यंदाच्या निवडणुकीत तुम्ही तुमचं मत माझ्या सहकाऱ्यांना द्या. तुमच्या प्रत्येक समस्येत मी तुमच्यासोबत राहणार. जर आपले १० आमदार निवडून आले तर ना ठाकरे ना शिंदे, ना गांधी, ना पवार आमच्याशिवाय कुणी सत्ता बनवू शकत नाही. ही सुवर्णसंधी आहे असं सांगत एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी महायुतीसहमहाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे.

छत्रपती संभाजीनगर याठिकाणी अकबरुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी ते म्हणाले की, १० वर्षांनी मी पुन्हा महाराष्ट्रात आलोय. जेव्हा मी १० वर्षाआधी महाराष्ट्रात आलो तेव्हा इम्तियाज जलील नव्हते, वारिस पठाण नव्हते, आमचे मालेगाव, धुळे इथले आमदार नव्हते. जेव्हा हे लोक निवडून आले त्यांनी जबाबदारीने एमआयएमचं नेतृत्व पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. आज १० वर्षांनी मी आलोय ते या लोकांच्या पाठीमागे मजबुतीने उभा राहून MIM चा झेंडा सांभाळण्यासाठी आलोय. अकबरुद्दीन ओवैसी कधी कुठल्याही लालसेची गरज नाही. नेतृत्व येईल आणि जाईल, जमात महत्त्वाचा आहे. आज परीक्षेची वेळ आहे. जवळपास ४ हजार उमेदवार त्यांचे नशीब आजमवत आहेत. १० वर्षापूर्वी भाजपा - शिवसेना होती आणि राष्ट्रवादी- काँग्रेस, , समाजवादी पक्ष होता मात्र आज काँग्रेस आहे, २ राष्ट्रवादी आहेत, २ शिवसेना आहेत, शिंदे सेना, ठाकरेसेना...हिंदुत्व बोलणारी शिवसेना-भाजपा पक्ष, आता हिंदुत्व विचारधारेच्या शिवसेनेचे २ तुकडे झाले. आता काँग्रेस आणि शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना जवळ केले. तीन पक्षांची आघाडी बनली. उद्धव ठाकरे हिंदुत्वाचा धडा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना शिकवण्यात यशस्वी झाले की नाही...राहुल गांधी प्रियंका गांधी हे पुरोगामित्वाचे धडे उद्धव ठाकरेंना देण्यात यशस्वी झाले की नाही? हा माझा प्रश्न आहे असा त्यांनी म्हटलं. 

त्याशिवाय अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी एकमेकांना समजून घेतले की भाजपाने दोघांना समजून घेतले..? कुठे आहे विचारधारा...यांच्याकडे विचारधारा नाही, धोरण नाही फक्त सत्तेची खुर्ची हवीय. आमचं काम लोकांची मने जिंकणे आहे. सत्तेवर बसून मज्जा लुटणारे आम्ही नाही. आम्ही खऱ्या अर्थाने समाजाचा आवाज संसद असो वा विधानसभा तिथे उचलून धरतो. अकबरुद्दीन ओवैसी मी मुसलमान आहे, मला मुस्लीम असल्याचा गर्व आहे आणि हिंदुस्तानी असल्याचा अभिमान आहे. आम्ही मुस्लिमांचा आवाज बनून मुस्लिमांची समस्या जाणतो. मुस्लिमांच्या हक्कासाठी लढतो. अन्यायाविरोधात उभे राहतो. पण मागासवर्गीयांना ताकद देणे, जो मागे आहे त्याला पुढे आणणं हे नेतृत्वाचं काम आहे. मागासवर्गीयांना ताकद देणे हा आमचा विचार आहे. आम्ही भडकाऊ भाषण करत नाही. आम्ही हक्काचं बोलतो, आमच्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे नसतात म्हणून त्याला भडकाऊ बोललं जातं असा टोलाही अकबरुद्दीन ओवैसींनी विरोधकांना लगावला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४aurangabad-central-acऔरंगाबाद मध्यAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी