शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांची गय नाही; भाजप प्रदेशाध्यक्षांनी बंडखोरांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 3:59 AM

पक्ष विरोधी कारवाया, गटबाजी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला.

सोलापूर : परळीमध्ये पंकजा मुंडे यांनी पक्षातील नेत्यांबाबत जे मतभेद मांडले ते चार भिंतींच्या आत मांडायला पाहिजे होते, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे वातावरण कडक झाले आहे. पक्ष विरोधी कारवाया, गटबाजी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही पाटील यांनी दिला.

सोलापूर शहराच्या नव्या महापौर आणि उपमहापौरांचा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ते म्हणाले, की, मी काल गोपीनाथ मुंडे गडावर गेलो नसतो तर तीव्रता वाढली असती. परळीचे चित्र मनाला समाधान देणारे नव्हते, पण संवादाने काही गोष्टी जुळून येतात. मला अनेकांनी सांगितलं तुम्ही त्या ठिकाणी जावू नका, तुमच्यावर हल्ला होईल. मी त्या ठिकाणी गेलो, कारण मतभेद असतात. संवादाने खूप गोष्टी सुटतात. मी गेलो. खूप संवाद झाला.

बावनकुळे यांनी केली फडणवीसांची पाठराखण

नागपूर : भाजपाचे बंडखोर नेते एकनाथ खडसे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेचे पडसाद पक्षातीलच ओबीसी नेत्यांमध्ये उमटत असून त्यांच्या वक्तव्याबद्दल पक्षात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. फडणवीस यांनी केवळ ओबीसी नेतेच नव्हे तर ओबीसी समाजाला देखील न्याय दिला, हे साºयांनाच ठाऊक असताना खडसे आणि पंकजाताई यांनी असे विधान करणे दुर्दैवी असल्याचे मत विदर्भातील ओबीसी नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.

पंकजांच्या सहनशक्तीचा कडेलोट - महाजन

औरंगाबाद/पुणे : पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर घेतलेली भूमिका ही त्यांचा संयम संपल्याचे प्रतीक आहे. त्यांना भाजपमधील नेतृत्व करणाºयांकडून प्रचंड त्रास होत असेल. संयम संपल्यामुळे कडेलोट झाल्याचे मत त्यांचे मामा प्रकाश महाजन यांनी व्यक्त केले.च्महाजन म्हणाले, पक्षाच्या नेतृत्वाने त्यांच्यावर ही परिस्थिती आणल्याचे स्पष्ट होत आहे. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वापासून सर्वांनाच मागील ४० वर्षांपासून ओळखत आहे. आतासारखी परिस्थिती कधीही नव्हती.

केंद्रीय नेतृत्व पक्षात काही घडत असेल तर तात्काळ लक्ष घालत असे. मात्र, आता तसे घडताना दिसत नाही. त्यामुळे हा संघर्ष आणखी वाढेल, असे प्रकाश महाजन म्हणाले. पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी ‘मंत्री होता, तेव्हा काय दिवे लावले,’असा सवाल मुंडे यांना केला, त्यावर पक्षाच्या आमदार व पुणे शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांनी ‘बाहेरचे लोक काय बोलतात याला महत्त्व नाही, असे सांगितले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार